Wednesday, September 7, 2022

महार बटालियनचे जुने संचलन गीत आपल्याला माहीत आहे का?

 


महार बटालियन चे जुने संचलन गीत आपल्याला माहीत आहे का? 


"महार सैनिक" 


वीर शिवाजी के बालक हम,

है महार सैनिक हम, हम, हम l

ना मशीनगन मे ही कौशल,

निपुण सभी शस्त्रो मे हम, हम l

वीर शिवाजी के बालक हम ll



आरक्षण हा अतिशय किचकट बनलेला विषय समजून घ्यायचा असेल भाषणातून इतरांना समजावून संगायचा असेल तर आजच या ग्रंथाची मागणी करा. 


जन - सेवक हैं,  सैनिक - वर हैं,

 दृढता शील दया के घर हैं l

 मातृ - भूमी - सेवा - हित करते,

 हम हरदम कर श्रम, श्रम, श्रम l

वीर शिवाजी के बालक हम ll


चोह पड रही धूप कडी हो 

वर्षा की लग रही झडी हो l 

आंधी तूफान उठा हो,  

चमक पडे बिजली चम, चम, चम ll

वीर शिवाजी के बालक हम ll



तो भी कार्य न छोडें हम,

धर्म से मुंह मोडे हम l

कटिनाई से भी कभी न डरते, 

आगे बढते कदम - कदम l

वीर शिवाजी के बालक हम ll



पर नारी माँ -  बहीन हमारी,

 उनकी रक्षा के प्रणधारी l 

तजे कुसंगती; संगति प्यारी,

 धर सहन शक्ती हम, हम, हम l

वीर शिवाजी के बालक हम ll



फैशन त्याग सादगी लावें, 

व्यसनोको हम दूर भगावे l 

सैनिक "रमतेराम" जतावे

 हृदिलै मानवता हम, हम, हम l

वीर शिवाजी के बालक हम ll



विद्या धारण ध्येय हमारा, 

जन - सेवा संकल्प हमारा l 

ब्रह्मचर्य में नित रत रहकर, 

रहे सत्य पर दृढ हम, हम, हम

वीर शिवाजी के बालक हम ll



महार सैनिक को अति प्यारा,

 मरून रंग का ध्वज यह न्यारा l 

सैनिक - शक्ती प्रबलता द्योतक 


झंडा उंचा रहे हमारा - 


जन - सेवक हैं,  सैनिक - वर हैं,

 दृढता शील दया के घर हैं l

 मातृ - भूमी - सेवा - हित करते,

 हम हरदम कर श्रम, श्रम, श्रम l

वीर शिवाजी के बालक हम ll


हे गीत लेफ्टनंट कर्नल घाशीराम यांनी सागर येथे 30 नोव्हेंबर 1953 ला महार रेजिमेंटल सेंटरचे नेतृत्व स्वीकारले तेव्हा लिहलेले आहे. त्यांनी हे गीत  हिंदी भाषेत लिहले. त्याला "महार सैनिक" संचलन गीत असे म्हटले गेले. "महार सैनिक" हे गीत त्यांनी स्वतः रचले व मार्चिंग सॉंग ऑफ महार सैनिक म्हणून प्रचारात आणले.

महार रेजिमेंटच्या स्थापनेपासून ‘वीर शिवाजी के बालक हम’ अशी या गीताची सुरुवात होती. याच चरणाने घोषगीत गायिले-वाजविले जात होते.  पुढे डिसेंबर १९६३ मध्ये ‘वीर शिवाजी’ या शब्द बदलून ‘वीर भारत’ असा बदल करण्यात आला.


विशेष सूचना : कृपया हा ब्लॉग कोणीही परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड करू नये. अन्यथा शब्दाची मोडतोड झाल्यास आपण स्वतः जबाबदार असाल. शेअर करावे वाटलेच तर ब्लॉग ची लिंक शेअर करावी. 

संकलन 

डॉ. ह. नि. सोनकांबळे 

Sunday, September 4, 2022

गांधीजींनी धर्म नाकारूनही धर्माचा उपयोग राजकारणासाठी केला







गांधीजींनी धर्म नाकारूनही धर्माचा उपयोग राजकारणासाठी केला


डॉ. ह. नि. सोनकांबळे


डॉ. हनुमंत कुरकुटे यांचा "गांधी विचारांची प्रसंगीकता संदर्भ : हिंद स्वराज्य" हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी गांधीजींच्या धार्मिक, राजकीय, आधुनिकता अशा विविध विचारांची संशोधन चिकित्सा केली आहे. आजच्या परिस्थितीत अस्तित्वात असलेले धार्मिक राजकारण आणि गांधीजींना अपेक्षित असलेले धार्मिक राजकारण यात मूलभूत अशा स्वरूपाचा फरक आहे. असे लेखकाचे मत आहे आणि ते त्यांनी अनेक संदर्भाचा माध्यमातून पुढे आणण्याचे काम केले आहे. 


आरक्षण या विषयावर परिपूर्ण भाष्य करणारा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. आपल्या जवळच्या विक्रेत्याकडे मागणी करा किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये आपला पत्ता आणि फोन नं आम्हाला कळवा. ग्रंथ आपल्याला घरपोच मिळेल.


गांधींचा पिंड मुलत: धार्मिक होता त्यामुळे मकीव्हॅलीच्या धर्मविहीन राजकारणापेक्षा धार्मिक राजकारणाचे समर्थन त्यांनी केले.मकीव्हॅलीने राजकीय सत्ता सिद्धांताची मांडणी करताना राजकीय सत्तेचे अस्तित्व शाबूत  ठेवण्यासाठी नैतिक साधनांचा अग्रह धरू नये असे म्हटले. उलट अनैतिक साधने ही नैतिक ठरतात असे स्पष्ट केले. गांधींनी मकीव्हॅलीचा हा सत्ता सिद्धांत नाकारला आणि नैतिक साधनांचा आग्रह धरला त्यांच्या मते नैतिक साधने म्हणजे धर्म होय गांधींनी मानवी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात लोककल्याणाचे साधन म्हणून नीती आचार विचार विवेक तत्त्वज्ञान या चारही लक्षणांचा अंतर्भाव धर्म संकल्पनेत केला त्यांची जनकल्याणासाठी आवश्यकता स्पष्ट केली. परंतु काळाच्या ओघात नीती विवेक हे मूल्य राजकारणातून जवळपास नष्ट झाल्यामुळे स्वार्थ, भ्रष्टाचार, संधी साधूपणा हे अभद्र स्वरूप राजकारणात समोर आले आहे त्याचे मुख्य कारण लोकांना धार्मिक मूल्यांची आवश्यकता पटली नसल्याने हे घडत आहे म्हणूनच धर्म आवश्यक ठरतो आहे कारण धर्म आणि राजकारण हे क्षेत्र भिन्न भिन्न नाहीत ते अंतर संबंधित आहेत त्यांच्यातील सांगड तुटल्यास मानवाला राजकारणाच्या कृत्यापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल असा गांधींचा राजकारण आणि धर्म समन्वया पाठीमागचा अभिप्राय होता. या संबंधानेच ते स्पष्ट करतात, मनुष्याच्या समाज व्यवस्थेत राजकीय सामाजिक आणि धार्मिक हे घटक स्वतंत्र नसतात तर त्यांच्यामध्ये सतत क्रिया प्रतिक्रिया घडून येत असतात म्हणून गांधींना धर्माची राजकारणाच्या नैतिकतेस नैतिकीकरणासाठी आणि सामाजिक कल्याणसाठी आवश्यकता भासते त्या संदर्भातच ते धर्म आणि राजकारणाचे विश्लेषण करतात. 


राजकारण ही सत्ता स्पर्धा आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी पक्षपात भ्रष्टाचार संधी साधूपणा खोटारडेपणा ही साधने महत्त्वपूर्ण ठरतात असे राजकारण करण्यातच राजकीय नेत्यांचा वेळ अधिक खर्च होतो यामुळे समाजाचे रोजचे जीवन मरनाचे प्रश्न बाजूला राहून विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी सर्वच राजकीय शक्ती लोकसेवकाकडून पणाला लावली जाते. ते हेच आपले कर्तव्य समजतात त्यासाठी गांधींना राजकारणात धार्मिक मूल्य आवश्यक वाटते. म्हणून ते म्हणतात धर्म केवळ स्वर्गाशी निगडित संकल्पना नाही तर मानवांचे जीवन सुखमय बनवण्याचेही ते साधन आहे त्यासाठी धार्मिक राजकारण असावे त्यातूनच भ्रष्टाचार संधी साधूपणा गुन्हेगारीपणा अनैतिकता नष्ट होईल समाजाचे सामाजिक प्रश्न सोडविण्यात राजकारणी आपला बहुमूल्य वेळ मार्गी लावतील असा गांधींचा धार्मिक राजकारणाच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. ते स्पष्ट करताना म्हणतात खरे तर आपले प्रत्येक कार्य धर्म संबंधित असायला पाहिजे धर्म म्हणजे संप्रदायवाद नव्हे तर जगाचे नैतिक संचालन करणारी प्रवृत्ती होय. कोणता धर्म हा श्रेष्ठ आणि कनिष्ठ आहे याचे मूल्यमापन मी कधीही करत नाही कोणत्याही धर्मावर आक्रमण करण्याचा माझा हेतू नाही धर्म हा हिंदू, मुस्लिम, शीख यापेक्षा पलीकडे असतो. असे त्यांचे म्हणणे होते. म्हणजेच त्यांनी नैतिकता म्हणजे धर्म अशी धर्माची व्याख्या केल्याचे दिसते. 


राजकारणाची धर्माशी सांगड घालत असताना त्यांनी याच नौतिकतेला धर्म समजून सांगड घातली. यातून त्यांनी दोन निशाणे साधले. एकीकडे अस्तित्वात असलेले सर्व धर्म नाकारले तर दुरिकडे धार्मिक राजकारणाचा पायाही घातला. पण नैतिकतेचा धर्म राजकारणात आणत असताना त्यांनी असे स्पष्टपणे सांगितले की, हमे सब धर्म के प्रति समभाव रखना चाहिए l इससे अपने धर्म के प्रती उदासीनता नही आती बलकी सर्व धर्मविषयक प्रेम अंधा न होकर ज्ञानमय हो जाता हैl अधिक सात्विक निर्मल बन जाता है l सब धर्म के प्रति समभाव आने पर ही दिव्यचक्षु खूल जाते हैl


एकूणच गांधीजींच्या राजकीय आणि धार्मिक विचारांची प्रसंगीकता समजून घ्यायची असेल तर हे पुस्तक एकदा नक्कीच वाचले पाहिजे.

  


पुस्तकाचे नाव: गांधी विचारांची प्रसंगीकता संदर्भ : हिंद स्वराज्य 


लेखक : डॉ. हनुमंत कुरकुटे


प्रकाशन : कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद

पृष्ठ : 232

किंमत : 280 

पुस्तकाच्या मागणीसाठी संपर्क

अनिल अतकरे

8055555500