डॉ. ह. नि. सोनकांबळे
dr.hanisonkamble@gmail.com
बुध्दाची भूमी हीच भारताची जागतीक ओळख असून प्राचिन काळापासून भारताचा शेजारील राष्ट्राशी सांस्कृतीक सबंध जोडला गेला आहे. तथागत बुध्दानंतर फाहियान सारखे अनेक चिनी प्रवाशी भारतात आले आणि बुध्दाच्या या भुमीचा अभ्यास करुन जगभरात तथागत गौतम बुध्दाचा उपदेश त्यांनी पोहचवला. इतकेच काय तर नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठाचे माॅडेल जगाला देणारा भारत हा एकमेव प्राचिन देश असल्याने अनेक देशातील विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असत आणि या देशातील बुध्दाची शिकवण ते आपल्या मायदेशी परत गेल्यावर आपल्या देशाला देत असत. म्हणूनच आज भारताविषयी अनेक देश आदर बाळगून असतात. परंतु याचा विचार प्रकर्शाने पुढे येत नाही. आज भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलायचे झाले तर केवळ आर्थीक कारणापुरते बोलले जात आहे. सांस्कृतीक देवाणघेवाण म्हणावी तशी होत नाही. आपल्या देशाला तेल, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तु पुरवठा करणाÚया देशाविषयी आपले सबंध कसे असावेत यावरच केवळ चर्चा घडून येत आहे. परंतु बुध्द कालखंडात भारताचा व्यवहार इतर देशासोबत कसा होता याचा विचार आज होताना दिसत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा धरुन भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार मांडला होता. अनेकांना असा प्रश्न पडतो की, परराष्ट्र धोरणाशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा काय सबंध आहे. कारण सर्वांना आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक पं. नेहरु आहेत हेच शिकवले गेले आहे. परंतु त्यांचे परराष्ट्र धोरण कसे चुकीचे होते हे सांगणारे तत्कालीन मंत्रीमंडळात एकमेव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यासबंधीचा आढावा या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिल्यानंतर 10 आॅक्टोबर 1951 रोजी आपल्या राजीनाम्याची कारणे सभागृहात मांडण्यासाठी ते उपस्थित झाले होते. परंतु त्यांना त्यांचे म्हणने मांडू दिले गले नाही. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा त्याग करुन बाहेर पडले. सभागृहाच्या बाहेर वर्तमानपत्रांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती ठीक नसल्याचे आणि हिंदू कोड बील मंजूर होत नसल्याचे अशी दोन कारणे राजीनाम्यामागे असल्याची पुष्टी जोडली होती. त्यांच्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक काढून आपल्या राजीनाम्याची कारणे त्यांत मांडली होती. त्यात अनेक कारणाबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्वाचे कारण होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा राजीनामा प्रस्तुत करत असताना म्हणतात की, मला खरी चिंता आहे ती देषाच्या परराष्ट्र धोरणाची. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातं॰य मिळाले तेंव्हा आपल्या बददल वाईट विचार करणारा किंवा आपले वाईट चिंतनारा एकही देश नव्हता. मागील चार वर्षात मा॰ा यात अचानक बदल झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. जगातील प्रत्येक देश आपला मित्र होता. आज हे सर्व मित्र आपल्याला सोडून गेले आहेत. आपल्याला त्यांनी वाळीत टाकले आहे. आपण सुरकुतलेल्या चेहऱ्याने युनोच्या निर्णयावर आपल्या ध्येयाचा पाठलाग करीत आहोत. जेंव्हा मी आपल्या परराष्ट्र धोरणाचा विचार करतो तेंव्हा मला बिस्मार्क आणि बर्नाड शॉ यांच्या एका वाक्याची आठवण होते. ते म्हणाले होते की, राजकारण इच्छित तत्व, ध्येय साध्य करण्याचा खेळ नसून, राजकारण हा शक्यतेचा खेळ आहे. चांगली तत्वे ही चांगली असतात पण अति चांगुलपणा हा घातक असतो असे म्हणून बर्नाड शॉ ला जास्त दिवस झाले नाहीत. परंतु आपले परराष्ट्र धोरण हे या दोन महान व्यक्तीच्या विचाराच्या विरुध्द आहे. आपल्या देशातील बहुतांश भुकेल्यांना अन्नपुरवठा व औद्योगीकरणास मदत करण्यास आपल्या देशात अडचणी येतात. अस्तित्वात न येणारे आणि अति चांगुलपणाचे धोरण आपल्याला कसे घातक ठरते हे या उदाहरणावरुन स्पष्ट होते.
आपल्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आपल्या तिजोरीवर कसा होतो हे सांगत असताना ते म्हणतात की, आपण वर्षात 350 कोटी रुपये कर रुपाने मिळवतो व त्यापैकी सुमारे 180 कोटी रुपये आपण सैन्यावर खर्च करतो. हा प्रचंड खर्च आपल्या परराष्ट्र धोरणाचा सरळ परिणाम आहे. आपल्याला ही रक्कम आपल्या स्वतःच्या संरक्षणाकरीता द्यावयाची आहे कारण आपला असा कोणी मित्र नाही ज्यावर आपण उदभवू शकणाऱ्या अपत्कालात मदतीसाठी विसंबून राहू शकू.
आपला पाकिस्तानशी वाद हा आपल्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे. या वादाची दोन महत्वाची कारणे बाबासाहेब सांगतात एक म्हणजे काष्मिर प्रश्न आणि दुसरा पुर्व बंगालमधील आपल्या जनतेची स्थिती. कष्मिरचा प्रश्न मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी महत्वचा तोडगा काढला होता परंतु राज्यकत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने तो प्रश्न आजपर्यंत चिघळत आला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते काश्मीर हा प्रदेश प्रामुख्याने समिश्र राज्य आहे. जम्मूमध्ये हिंदू, लढाख मध्ये बौध्द तर काश्मीर खोरे हा मुस्लीम प्रदेश आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी असे स्पष्ट पणे सांगितले की, काष्मिरची फाळणी करावी आणि हिंदू, बौध्द भाग भारतात जोडावा, मुस्लीम भाग पाकिस्तानात जोडावा. वस्तुतः काश्मीरचा मुस्लीम भागाशी आपला काहीही सबंध नसल्याने तो प्रश्न तेथील मुस्लीम आणि पाकिस्तान यांनी सोडवावा. जर वाटलेच तर काश्मीर युध्दबंदी भाग, काश्मीर खोरे आणि जम्मू लडाख असे तीन भाग करुन सार्वमत घ्या. असे झाले असते तर हा प्रश्न केंव्हाचाच मिटला असता परंतु केवळ नेहरुंच्या आडमुठेपणामुळे हा प्रश्न आजपर्यंत चिघळत आला असून यावर संरक्षणाच्या नावाखाली भारत करोडो रुपये खर्च करत आला आहे.
भारत चिन सबंधावरही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष लक्ष होते. त्यानी चिनच्या आणि भारताच्या हालचाली अचूक पणे अभ्यासल्या होत्या म्हणूनच त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण भारत चिन सबंधातील महत्वाची गोष्ट म्हणजे 21 एप्रिल 1954 ला या दोन देशात पंचशील करार करण्यात आला. यात एकमेकांना सहकार्य करणे, एकमेकांबददल विश्वास ठेवणे, एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे, एकमेकावर हल्ले न करणे अशा स्वरुपाचा हा करार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौध्द धम्मावर अतिशय प्रेम होते तरी त्यांनी या करारावर टिका केली आहे. कारण पंचशीलाचे आचरण चिन करत नाही असे त्यांचे म्हणने होते. ते म्हणतात की, आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशीलाला जागाच नसते व कम्युनिष्ट देशात मुळीच नसते बौध्द धम्मात जरी पंचशीलाल महत्व असले तरी चीनच्या माओनी पंचशीलाचे आचरण आगोदर चीनमध्ये करावे. अशी सडेतोड भूमिका घेताना बाबासाहेब दिसतात.
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना भारत महासत्ता कसा होईल याकडे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष लक्ष होते. 8 नोव्हेंबर 1951 रोजी लखनौ विद्यापीठात विद्याथ्र्यांच्या स्नेहसम्मेलनात बोलताना त्यांनी एक महत्वाचा मुददा उपस्थित केला होता. भारताने एंकतर संसदीय लोकशाही स्विकारावी किंवा साम्यवादी हूकुमशाहीचा मार्ग स्विकारुन अंतिम निर्णयापर्यंत यावे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत का स्थायी सभासद होत नाही आणि त्यासाठी सरकार का प्रयन्त करत नाही? हा महत्वाचा प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात. तत्कालीन परिस्थितीत नेहरुनी भारताच्या स्थयी सदस्यत्वाविषयी युनोमध्ये बोलायला हवे होते. परंतु असे न करता त्यांनी चिनला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून पाठींबा दिला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर त्या वेळेस म्हणाले होते की, भारताने चिनला पाठींबा देवून आपला वेळ वाया घालवू नये कारण भविष्यात चिन भारताला कधीच मदत करणार नाही. हा त्यांनी दिलेला इशारा खरा ठरला काश्मीरच्या मुदयावर चिनने युनोत भारताच्या विरोधात भूमिका तर घेतलीच पण आजही भारतावरचे चिनचे हल्ले बंद झाले नाहीत. याचा अर्थ असा होतो की, सध्या आपण भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून जो प्रयत्न करत आहोत तो साठ वर्षापुर्वीच करायला हवा होता आणि चिनसोबत आपले सबंध कसे असावेत याचा विचार करायला हवा होता. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विषय समजून घेण्यासाठी राज्यकत्र्यांंना आपल्या राजकारणाची साठी ओलांडावी लागली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेबददल ‘द टाइम’ मासिकाने लिहले होते की, डाॅ. आंबेडकर हे एकमेव भारतीय अधिकारी आहेत की ज्यांनी चीनसोबतच्या अतीमित्रत्वावर आणि अमेरिकेबरोबरच्या अल्पमैत्रीबद्दल नेहरुवर उघडपणे हल्ला केला. यावरुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सडेतोड भूमिकेची जाणीव आपल्याला होते. काळाची पावले ओळखून आम्ही आपले परराष्ट्र धोरण आखायला हवे असे बाबासाहेबांना वाटायचे. तशी दृष्टी त्यांच्याकडे होती. त्याचे उदाहरण आपल्याला देता येते. 1939 साली रशियाच्या क्रांतीवर एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता की, रशीयाच्या राज्यक्रातीबददल तुमचे काय मत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपुर्वत उत्तर देताना म्हटले होते की, फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा मला ही राज्यक्राती महत्वाची वाटते परंतु ज्या विचाराच्या पायावर रशियाच्या क्रांतीचा डोलारा उभा आहे तो एकेदिवषी कोसळल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचे म्हणने पन्नास वर्षानंत खरे ठरले रशिया 1991 साली कोसळला. ही दूरदृष्टी फक्त त्यांच्याकडेच होती.
आता प्रश्न असा शिल्लक राहतो की जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटत होते तर त्यांनी नेहरुना का सांगितले नाही? हाच प्रश्न नेहरुंना देखिल पडतो. या प्रश्नाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1951 ला उत्तर दिले आहे ते 1 आणि 8 दिसेबर च्या जनता मध्ये देखिल प्रसिध्द झाले होते. ते म्हणतात की, ‘मंत्रीमंडळात असताना मी त्यासबंधी काहीही बोललो नाही असे नेहरुंचे म्हणने आहे. त्यावर माझे मत असे आहे, की मी 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत घटनेच्या कामात व्यग्र होतो. तेंव्हा परराष्ट्र धोरणावर नेहरुंषी बोलायला वेळच मिळाला नाही.’ खरे तर भारताचे परराष्ट्र धोरण हे खाते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असते तर भारत एकमेव दहशतवादमुक्त देश झाला असता आणि भारताचे अनुकरण अनेक देशांनी केले असते. कारण सुरुवातीपासून भारत ही बुध्दाची भूमी असून जगाला इथूनच खरा प्रेमाचा, ज्ञानाचा आणि शांतीचा संदेष गेला आहे. परंतु भारताचे बदलते परराष्ट्र धोरण भारताला या गोष्टीपासून दूर घेवून जात आहे. एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न बघत असतानाचा जातीच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय मानव अधिकाराची होळी याच देशात पेटवली जात आहे. कधी मानवतेचा संदेश या देशातून बाहेर पडत होता आज मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांच्या किंकाळया बाहेर पडू लागल्या आहेत. म्हणूनच जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलू लागला आहे. ब्रिटीश संसदेचे सदस्य भारताविषयी बोलताना एकवेळेस म्हणाले होते की, भारत काय आहे तर जातीव्यवस्थेचे एक उत्तम उदाहरण आहे. हीच ओळख भारताची जागतीक स्तरावर निर्माण झाली आहे. म्हणून आज वास्तवात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तिन तेरा झालेत आपण नेमके काय करत आहोत आणि कोण आपल्यासोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत याचाच शोध राज्यकत्र्यांना लागत नाही. अलिप्ततावादाचे धोरण आपल्याला आज जगापासून अलिप्त करताना दिसत आहे. नेहरुंचे परराष्ट्र धोरण आम्ही छातीठोकपणे विद्यार्थ्यांना शिकवत असलो तरी हे कसे चुकीचे आणि पळकुटे होते हे दखिल शिकवणे गरजेचे आहे. नेहरुंच्या या धोरणात नंतर श्रीमती इंदिरा गांधींनी थोडासा बदल केला असला तरी तो पुरेसा नाही. येणाऱ्या काळात जर भारताला खरे महासत्ता व्हायचेच असले तर नेहरुंच्या परराष्ट्र धोरणात खूप मोठे बदल करुन बुध्द ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास समजून घेवून भारताने आपले परराष्ट्र धोरण ठरवणे गरजेचे आहे. तेंव्हाच कुठे पुन्हा एकदा भारतातून प्रेमाचा, ज्ञानाचा, मानवतेचा आणि विश्वशांतीचा संदेश जगभरात जाईल.
विनंती : या विषयावर आपल्याकडे आणखी काही माहिती असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका
विनंती : या विषयावर आपल्याकडे आणखी काही माहिती असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका