Monday, April 13, 2020

अख्ख जग "जय भीम" मय



https://youtu.be/WCow6OwS9TM
लिंक वर जाऊन व्हिडीओ पहा.

डॉ. ह. नि. सोनकांबळे 
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे अभ्यासक. 

 लंडन, टोरंटो, कॅलिफोर्निया, जापान, नाॅर्थ अमेरिका, नेदरलॅंड, युके, पाकिस्तान, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, न्युयाॅर्क, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जीएम, स्विडन, नाॅर्वे अषा अनेक देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते पण याच्या बातम्या कधीच भारतात येत नाहीत. 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो की आणखी कोणता उत्सव असो, तो साजरा करत असताना त्यांचे एक वाक्य नेहमी डोळयासमोर येते. ‘You can hate me, you can oppose me, but you can not ignore me.’ त्यांचे  हे वाक्य आज खरे होताना दिसते आहे.  असे जरी असले तरी आज जगभरातले लोक व विद्यार्थी त्यांना आदर्श मानत आहेत. ही एकप्रकारे आनंदाची बाब आहे. 

1913 ला जेव्हा ते परदेषात शिक्षणासाठी गले तेव्हाच त्यांनी त्यांच्या वैश्विकरणाचा  पाया घातला होता आणि याच पायावर आज खूप मोठी इमारत उभी राहिली आहे. ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले त्याचा संपुर्ण इतिहास भारतातील आंबेडकरी अनुयायांना तसेच जगभरातील विव्दानांना माहित झाला आहे. याच विद्यापीठात ‘लेहमन’ नावाच्या एका ग्रंथालायात कार्ल मार्क्क्स सह अमेेरिकेच्या सहा राष्ट्राध्यक्षांनी आणि अनेक विव्दानांनी अभ्यास केला. त्याच ग्रंथालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देखिल अभ्यासाला बसत असत. या ग्रंथालयात अभ्यास करुन अनेकांनी उच्च पदे भूशविली मात्र यापैकी कोणाचाही पुतळा या ग्रंथालयात दिसत नाही एकमात्र केवळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा या ग्रंथालयात बसविण्यात आला असून पुतळयाच्या बाजूलाच भारतीय संविधान, भारत सरकारने तयार केलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोश्टाचे तिकिट व त्यांच्या जीवनासबंधीची बराचसा दस्ताएैवज ठेवला आहे. याच विद्यापीठाच्या ‘कोलंबिया लाॅ स्कुल’ मध्ये 14 एप्रिल 2010 ला डाॅ. बी. आर. आंबेडकर रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. अनेक देषातील विद्यार्थी इथे येवून विविध देषातील संविधानाचा अभ्यास करत असतात. 


दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टोरंटो येथील ‘सायमन फ्रेजर’ या विद्यापीठात ‘डब्लू सी बेन्नेटो’ नावाचे एक सुंदर ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाच्या चैथ्या मजल्यावर एका मोठया मोकळया जागेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला असून या ग्रंथालयाच्या सातव्या मजल्यावर त्यांच्या पुस्तकासाठी स्वतंत्र दालन देखिल तयार करण्यात आले आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीसांठी या विद्यापीठात एकुण तेरा पुरस्कार दिले जातात त्यात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात उत्कृश्ट कार्य करनाऱ्या एका विद्याथ्र्याला ‘डाॅ. बी. आर. आंबेडकर हयुमॅनिटेरिअन अवार्ड’ नावाचा पुरस्कार देखिल दिला जातो. 


‘लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचे धडे गिरवले. हे स्कुल देखिल त्यांना विसरु शकले नाही. या स्कुलच्या ‘क्लेमेंट हाऊस’ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि एक सुंदर तैलचित्र दर्षनी भागात बसविल्याचे आढळून येते. शिवाय 1973 सालीच या स्कुलचे अध्यद्क्ष आॅथर जाॅन यांनी तेथील ग्रंथपाल क्लार्के, भारताचे तात्कालीन उच्चायुक्त एम. रसगोत्रा आणि लंडन येथिल सर वाल्टर अॅडम्स, डाॅ. एच सद्दातिस्सा यांच्या उपस्थितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक तैलचित्र या स्कुलच्या दर्षनी भागात लावल्याचे दिसून येते. दरवर्शी त्यांच्या विचारावर आधारीत अनेक चर्चासत्राचे आयोजन देखिल करण्यात येते. 


ज्या देषात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्याच देशात गौरव होत आहे असे नाही तर इतरही अनेक देशामध्ये त्यांच्या नावाचा गौरव चालूच असतो त्यातलेच एक युरोपातले ‘हंगेरी’ हे राज्य आहे. या राज्यात ‘रोमा आणि जिप्सी’ या दोन प्रमुख आदिवासी जमाती राहतात. त्यांच्या उद्धरासाठी डाॅ. आंबेडकरांची चळवळ ‘द डॅक आणि सोरायसीय’ या दोघांनी उभी केली आहे. ते 2005 ते 2007 च्या दरम्यान भारतात आले होते इथल्या चळवळींचा आणि डाॅ. आंबेडकरांच्या दलितोद्धाराचाअभ्यास त्यांनी इथे केला आणि त्यांनी हंगेरीत जावून ‘जयभीम नेटवर्क’ नावाचे एक संघटन उभे केले. याच संघटनेच्या माध्यमातून  त्यांनी ‘द आंबेडकर स्कुल्स’ नावाच्या शाळा देखिल सुरु केल्या आहेत. आज त्यांचे हे संघटन या आदिवासी जमातींच्या उद्धारासाठी कार्य करत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटीत व्हा आणि संघर्श करा हा मुलमंत्र घेवून हे सर्व लोक काम करत आहेत. अनेकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आहे. 


इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिकेत देखिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचले आहेत. 2008 साली दक्षिण आफ्रिकेचे राश्ट्रा/यक्ष ‘थाबो एम्बकी’ यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना डाॅ. आंबेडकरांच्या अर्थषास्त्राचे संदर्भ देवून दक्षिण आफ्रिकेला आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या विचारांची कशी गरज आहे हे पटवून दिले होते हे भाषण  भारतातील अनेक इंग्रजी वर्तमानपत्रात देखिल छापून आले होते. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या षैक्षणिक क्षेत्रात देखिल डाॅ. आंबेडकरांचे नाव एक चर्चेचा विशय ठरले आहे. म्हणूनच ज्या जोहान्सबर्ग विद्यापीठात नेल्सन मंडेला यांचे शिक्षण झाले त्या विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ‘आंबेडकर मंडेला’ दिवस साजरा केला जातो.


पाकिस्तानसारखे कट्टर धार्मिक राष्ट्र देखिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरु शकले नाही. त्यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त लाहोर, कराची आणि सिंध पाकिस्तान मध्ये विविध चर्चासत्राचे आणि जयंतीचे आयोजन केले होते. तर लाहोर स्थित ‘सर गंगाराम हेरिटेज फाउंडेशन’ गेल्या आठ वर्शापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी पाकिस्तानत करत आहे. 


जर्मनिच्या बाॅन विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष प्रयत्न केले होते आणि प्रवेशासाठीही त्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या या स्मृती या विद्यापीठाने आजही जपल्या आहेत. तर त्यांच्या शोषणमुक्तीच्या लढयाची प्रेरण घेवून ‘दलित साॅलिडरिटी नेटवर्क’ अनेक देशात काम करत आहे. त्यांनी तयार केलेल्या ‘द आंबेडकर प्रिन्सिपल्स’ ला ब्रिटीश संसदेने 2007 साली मान्यता देखिल दिली असून अनेक आंतरराश्ट्रीय कंपन्यांना हे प्रिन्सिपल्स लागू करण्यात आले आहेत. 


कॅनडा मध्य्ये याॅर्क नावाचे एक मोठे विद्यापीठ आहे. विद्यापीठात 55 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर, सात हजार 
प्राध्यापक या विद्यापीठात काम करतात, शिवाय 5462 विद्यार्थी विविध 157 देषातून या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. या विद्यापीठात जवळपास 5 हजार विविध प्रकारचे कोर्सेस चालतात. या विद्यापीठातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले 283,000 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध देशातील सर्वोच्च पदावर काम करतात.  या भव्य विद्यापीठात एकुण पाच ग्रंथालय आहेत. त्यातलेच एक स्काॅट लायब्ररी नावाचे सर्वात मोठे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात डिसेंबर 2015 मध्ये
एक सोहळा पार पडला तो सोहळा होता डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरनाचा.


लंडन, टोरंटो, कॅलिफोर्निया, जापान, नाॅर्थ अमेरिका, नेदरलॅंड, युके, पाकिस्तान, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, न्युयाॅर्क, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जीएम, स्विडन, नाॅर्वे अषा अनेक देषात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पोहचले आहेत. ज्यांना जातीपुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज संपुर्ण जगाचे वैचारीक नेतृत्व करीत आहेत. 




(लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्सच्या ग्रंथालयात 1973 साली बसविण्यात आलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र. या प्रसंगी डावीकडून प्रा. आॅथर जाॅन (अ/यक्ष), मि. डी. ए. क्लार्के (ग्रंथपाल) मि. एम. रसगोत्रा (भारताचे उच्चायुक्त), सर वाल्टर अॅडम्स, डाॅ. एच. सद्दातिस्सा (प्रमुख लंडन बु/द विहार))



कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन ग्रंथालयात बसविण्यात आलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, प्रसंगी माईसाहेब आबेडकर, अॅनस्ली एम्ब्री. 



(सइमन  फ्रेजर विद्यापीठाच्या डब्लू ए सी बेन्नेट्टो ग्रंथालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दर वर्शी साजरी केली जाते. सर्व कर्मचारी या जयंतीसाठी उपस्थित असतात. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची 120 वी जयंती साजरी करताना विद्यापीठाचे व ग्रंथालयाचे कर्मचारी )


दक्षिण आफ्रिकेतील विठवाॅटर्सरॅंड या वि़द्यापीठात ‘आंबेडकर.मंडेला दिवस’ साजरा करण्यात आला 


कॅनडा येथील याॅर्क विद्यापीठाच्या स्काॅट लायब्ररी म/ये बसविण्यात आलेला पुतळा.

Monday, April 6, 2020

हान सख्या आता तुझी बारी, लोकशाही गेली तर...!





डाॅ. ह. नि. सोनकांबळे


लोकशाहीत लोक आपल्या हक्काच्या बाबतीत जागरुक, कर्तव्याच्या बाबतीत उत्साही आणि आपल्या देशाच्या राज्यकारभारावर प्रत्यक्ष लक्ष ठेवणारे असावे लागतात. पण आजच्या संकटाच्या घाडीतही लोक याचा विचार करत नाहीत. हे सर्व गुण सुरुवातीला अथेन्सच्या लोकशाहीत असल्याचे दिसून येतात. म्हणूनच त्यांच्या लोकशाहीने जो उच्चांक गाठला होता तो आज कोणत्याही देशाच्या लोकशाहीला गाठता आला नाही. 


भारतीय लोकशाहीमध्ये कर्तव्यात कसूर करणारे, हक्काबाबत उदासिन असलेले आणि राज्यकारभार आपल्या हाती नाही असे समजणारे लोक मोठया प्रमाणात दिसून येतात. 2014 च्या निवडणूकीपासून जनतेचा निवडणूकीतला सहभाग वाढला असला तरी जनतेचे सार्वभौमत्व या अनुषंगाने  शासनावर सामान्य जनतेचा म्हणावा तसा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. म्हणूनच अॅरिस्टाॅटलने सांगितल्याप्रमाणे अशा लोकांना घटनात्मक लोकशाहीचा वापर करता येत नाही. त्यांच्यामध्ये एकमताचा अभाव निर्माण होवून प्रत्येकजन स्वार्थाच्या पाठीमागे लागतो आणि राज्याचे स्थैर्य व सुव्यवस्था संपुष्टात येते. असेच चित्र भारतीय लोकशाहीत निर्माण होताना दिसते आहे. 



रोम मध्ये ज्याप्रमाणे लोकशाहीची जागा ख्रिश्चन धर्माने घेतली तशीच  परिस्थिती भारतात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सार्वभौम जनतेने संविधानाच्या पातळीवर शासनाचा कारभार कोणत्या दिशेने जात आहे याचे आॅडीट करणे गरजेचे ठरते. त्याचा एक भाग म्हणून ‘सार्वभौम लोकशाही गणराज्य अस्तित्वात आणून भारतीय जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, उच्चार, श्रध्दा, पूजेचे समान स्वातंत्र्य, नागरिकांना समान दर्जा, सर्वांना समान संधी उपलब्ध करुन देण्याचे घटनेने दिलेले आश्वासन मागच्या 70 वर्षात पूर्ण झाले का?


लोकशाहीमध्ये अंतीम सत्ता जनतेच्या हाती असल्याने जनतेचे हीत लक्षात घेवून धोरण निश्चिती केली जाते का? याचा विचार करण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला असते. म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्याला लोकशाहीचा कणा मानलेले आहे. जर व्यक्ती स्वतंत्र नसेल आणि निर्भयपणे तो या सर्व गोष्टीचा विचार करु शकत नसेल तर ते लोकशाहीचे अपयश असते. त्याचे स्वातंत्र्य आबाधीत रहावे म्हणूनच गुप्त मतदान प्रक्रियेतून सरकार बदलण्याची जादू केवळ लोकशाहीतच करता येते. 


परंतू त्या बाबतीत भारतीय जनता आजूनही साक्षर झालेली वाटत नाही. आजही गरीब जनतेचा मतदानाचा हक्क हा केवळ एक देखावा असल्याचे दिसून येते. 

जर त्या हक्काचा वापर जनतेने विचारपूर्वक केला तर निवडणूकीच्या काळात दिलेली आश्वासने, केलेल्या घोषणा दर पाच वर्षात पूर्ण झालेल्या दिसल्या असत्या आणि दर पाचवर्षाला कल्याणकारी शासनाची निवड जनतेने केली असती. परंतु तसे घडत नाही. म्हणूनच भारतीय लोकशाहीवर राजकीय वारसदार, धनिक लोक, आणि गंुडांचा कब्जा तर होत नाही ना? याची दक्षता मतदारांनी घेणे गरजेचे आहे. 


कारण संसद हे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असल्याने त्या मंदिरात स्वच्छ चारित्र्य, कल्याणकारी धोरण आणि जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा असलेल्या व्यक्तीलाच प्रवेश  दिला पाहिजे. तेव्हाच कुठे संविधानाने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होवू शकते. अन्यथा मिल्स ने सांगितल्याप्रमाणे लोकशाहीच्या चित्रपटात उद्योगपती आणि राजकारणी हे दोघेच नायकाची भूमिका पार पाडतात आणि सार्वभौम असलेली जनता प्रेक्षकाच्या भमिकेत बसलेली असते. हे नायक उच्च आणि मध्यम वर्गापर्यंतच सत्ता मर्यादित ठेवतात खालच्या वर्गापर्यंत कधीच पोहचू देत नाहीत. 

अशा वेळेस प्लेटोने ‘शिस्तीचा आभाव’ ही लोकशाहीवर केलेली टीका खरी वाटायला लागते.
गरीब जनतेला या सर्व गोष्टीची सवय लागते. त्यांना लोकशाही आली काय आणि गेली काय? काही फरक पडत नाही. म्हणूनच भारतासारख्या देशात गरीबी आणि लोकशाही हातात हात देवून प्रवास करताना दिसतात. त्यामूळे काळाच्या कसोटीवर आपण लोकशाही स्विकारली असली तरी अंमलबजावणी करणारे लोक यशस्वी ठरलेत का? याचा विचार सार्वभौम जनतेने कर्तव्यदक्ष राहून एक जबाबदार शासन निवडणे गरजेचे असते. जे देशावर आणि देशातल्या जनतेवर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना योग्य रीतीने आणि जबाबदारीने करेल.  अन्यथा कवी नामदेव ढसाळ म्हणतात त्या प्रमाणे, ‘हान सख्या आता तुझी बारी, लोकशाही गेली तर...!’ अशा भूमिकेत आपण राहिलो तर लोकशाही कधीच यशस्वी होणार नाही आणि कोणत्याही संकटाचा सामना आपण एकत्र येऊन करू शकणार नाही.  





Wednesday, April 1, 2020

तिसरे महायुद्ध आणि माणसे वाचविणारी शस्त्रे



डॉ. ह. नि. सोनकांबळे

गेली 75 वर्षात जगभरातील अनेक देशांनी शस्त्रास्त्रे निर्माण केली आणि युद्धासाठी तयारही झाले, पण ही सर्व शस्त्रास्त्रे आजच्या युद्धात निकामी ठरत आहेत. आम्ही माणसे मारण्याची शस्त्रास्त्रे उभी केली माणसे वाचवण्याची नाही. आज याच शस्त्रास्त्रांची गरज आहे. जो देश इथून पुढे माणसे वाचविण्याची शस्त्रास्त्रे आणि यंत्रणा उभी करेल तोच देश हे युद्ध जिंकेल. 

गेली काही दिवसांपासून जग तिसरं महायुद्ध लढत आहे. हे महायुद्ध आहे कोरोना विरुद्ध जग. साधारण पाच वर्षापिर्वी चीन मध्ये एका शास्त्रज्ञाने अशी घोषणाच केली होती की तिसरे महायुद्ध हे शस्त्रास्त्रांचे नसेल तर व्हायरसचे असेल. सुरुवात अर्थातच तिथूनच झाली. चिननेच हा व्हायरस तयार केला असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षबरोबर यावर चर्चा करून वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न जेव्हा UNO ने केला तेव्हा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी साफ नकार दिला. 

खरोखरच हा व्हायरस चीनने तयार केला असेल का? 
चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याचा दावा

चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने हा व्हायरस एका प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचे सांगून मी त्याचा साक्षीदार आहे असे सांगितले. हा व्हायरस तयार करण्याच्या पाठीमागे चिनचा वेगळा उद्देश असल्याचेही सांगत असताना तो अधिकारी म्हणतो 'हा व्हायरस हॉंकाँग मध्ये सुरु असलेल्या चिनी सरकारच्या विरोधातल्या बंडाच्या आंदोलनात वापरला जाणारा होता. 

दोन शास्त्रज्ञांचा दावा
शास्त्रज्ञ बोताओ शाओ आणि ली शाओ 

या दोन शात्रज्ञांनी असा दावा केला आहे की, चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीनुसार, हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC)ने या व्हायरसची निर्मिती केली असावी. काही दिवसांपूर्वी या प्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा काही प्राणी ठेवण्यात आले होते. यात ६०५ वटवाघळे होती. यातील एका वटवाघळाने एका संशोधकावर हल्ला केला. त्यावेळी वटवाघळाचे रक्त त्या संशोधकाच्या शरिरात गेले असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला असल्याचे वृत्त 'डेली मेल'ने दिले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प 

डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हायरसला सरळ चिनी व्हायरस असे म्हटले आणि चीनचा तिळपापड झाला. त्यांनी जगभरातील नेत्यांना असे आवाहन केले की या व्हायरस ला चिनी व्हायरस म्हटल्याने चीनची बदनामी होत आहे त्यामुळे या व्हायरस ला चिनी व्हायरस म्हणू नये. 

एकूणच हे चित्र पाहता असे स्पष्ट होते की, हा व्हायरस चीनने मुद्दाम तयार केला आहे आणि या व्हायरसने जगाचे नुकसान केले आहे. जगाची अशा प्रकारची कोणती हानी होऊ नये म्हणून जागतिक स्तरावर 1920 पासून राष्ट्र संघ व पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तिसरं महायुद्ध होणार नाही याची विशेष काळजी UNO ने आतापर्यंत घेतली होती. पण असे युद्ध होईल याची जाणीव UNO किंवा WHO ला नव्हती. 

पुढे काय

आज संपूर्ण जग हे युद्ध लढत आहे. जगाणे आजपर्यंत शस्त्रास्त्र निर्माण करून युद्धाची तयारी केली होती. कोण कोण कोणाच्या विरोधात लढेल हे निश्चित नव्हते पण तयारीत सर्व जण होते. पण या सर्वांना हि सर्व शस्त्रास्त्रे बाजूला ठेवावी लागली आहेत. त्याऐवजी माणसाला वाचविणारी शस्त्रे निर्माण करण्याचा संदेश या युद्धाने दिला आहे. 


दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे कोणतेही नुकसान होऊ नये, शांतता नांदावी याची काळजी घेण्यासाठीच जगाणे UNO ची स्थापना केली होती. पण आज अशी वेळ जगावर आली आहे की पुन्हा एकदा UNO ला या वेगळ्या युद्धपासून जगाला वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. माणसे मारणारी शस्त्रास्त्रे गेली 75 वर्षात अनेक देशांनी तयार केली आहेत पण आज जगाला माणसे वाचविणारी शस्त्रास्त्रे निर्माण करण्याची वेळ आली आहे. 

UNO, WHO आणि जगभरातील सर्वच देश याचा नक्की विचार करतील आणि UNO सारखीच एखादी संघटना स्थापन करून भविष्यातल्या अशा युद्धाला देखील रोखण्यासाठी सर्वच देश एकत्र येतील. जर येत नसतील तर अशा युद्धाला नेहमीच तोंड देत बसावे लागेल.

★लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापनाचे कार्य करतात.