Wednesday, June 30, 2021

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख

 

 


दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख 


डाॅ. ह. नि. सोनकांबळे

 

 
    अटलबिहारी वाजपेयी यांनी सामाज कल्याण खात्याचे नाव बदलून सामाजिक न्याय असे केले आणि अनुसूचित जाती-जमातीच्या आर्थिक उन्नतीला ब्रेक लागला. तदनंतर कोणत्याही सरकारने या समूहाच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामूळे या समूहातील दारिद्रय रेशेेचे प्रमाण कमी होवू शकले नाही. केंद्रसरकारने तर नेहमीच हात झटकले. पण राज्य सरकारे देखिल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बजेट मांडत असताना आर्थिक तरतुद तर केली गेली. परंतु हे बजेट एक तर परत पाठवले जावू लागले किंवा दुसरीकडे वळवले जावू लागले. याचा अनुभव गेली अनेक वर्ष महाराष्ट्र  घेत आला आहे. 


    सध्याच्याही सरकारमध्ये असलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही यापेक्षा काही वेगळे केल्याचे दिसत नाही. परंतु या सर्व परंपरलेला तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर  राव यांनी बाजूला सारुन एक नवा आदर्श  निर्माण केला आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री दलित अधिकारीता कार्यक्रमांतर्गत’ दलित कुटंुबाच्या खात्यात थेट 10 लाख रुपयांच्या मतदीची घोषणा केली आहे. सुरुवातीला या योजनंअंतर्गत पहिल्या वर्षी 119 विधानसभा मतदारसंघातून 11,900 कुटंुबाची निवड केली जाणार आहे. या कुटंुबाच्या खात्यात थेट 10 लाख रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. 



    ही योजनेसाठी येणाऱ्या  चार वर्षात  40 हजार कोटींची तरतुद केली जाणार असून दरवर्षी 119 विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी 100 कुटंबाची निवड केली जाणार आहे. 


    सध्या सत्तेत असलेल्या  टीआरएस पार्टीचा असा दावा आहे की, या योजनमूळे येणाऱ्या  काळात दलितांचा आर्थिक विकास होईल व राज्यातील दारिद्रयाचे प्रमाण देखिल कमी होईल. 


    सध्या देषभरात रोजगाराचा मोठा प्रश्न  निर्माण झाला असून अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा  परिस्थितीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयाने हजारो कुटंबांना आधार दिला आहे. त्यामूळे चंद्रशेखर राव यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

 



    इतर राज्यांच्या सरकारने देखिल दारिद्रय निर्मुलनासाठी याचा विचार करणे आपेक्षीत आहे. कारण सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराज म्हणायचे, ‘शासनकर्ता जर आईबापासाखा असेल तर तो प्रजेपैकी दुबळया विभागाकडे खास लक्ष देतो आणि ता तसा नसेल तर ज्यांचे चांगले चालले आहे त्यांनाच अधिक देतो आणि जे दुबळे आहेत त्यांना आर्थिक दुर्बल करतो. पहिला समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावले टाकतो, तर दुसरा विषमता वाढवतो.’ टीआरएस चे सरकार हे शाहू महाराज म्हणतात त्या प्रमाणे तेथिल जनतेला ‘आई बापासारखे’ वाटत आहे. 

 

विनंती : 

आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.

 

2 comments:

  1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
    येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला कराल हीच अपेक्षा!
    धन्यवाद

    ReplyDelete