Wednesday, July 7, 2021

१२ कोणी वाजवले ?



तरुणांचे १२ कोणी वाजवले ?

 डाॅ. ह. नि. सोनकांबळे

 

 

शरद पवार महाराष्ट्राला नवं वैभव प्राप्त करुन देतील अशी आपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. उध्व ठाकरे चांगलं काम करत आहेत महाराष्ट्राला आता चांगले दिवस येतील असेही लाक सुरुवातीला म्हणत होते. पण सुरुवातीपासूनच 12 आमदार हा विषय विनाकारण चघळला गेला. आज पुन्हा नव्या 12 आमदारांचा प्रश्न  निर्माण झाला आहे आणि जनतेच्या आपेक्षांचेही 12 वाजले आहेत. या १२ आमदारामुळे महाराष्ट्राचे कोणते प्रश्न आडले आहेत. त्यांची नियुक्ती झाली नाही किंवा बडतर्फ केल्याने जनतेचे असे काय नुकसान झाले आहे. याचे ऊत्तर कोणालाच सापडत नाही. म्हणून लोक आता  12 मतीवर प्रश्न  उपस्थित करत आहेत.

नवं सरकार येईल आणि काही तरी नवं होईल. या जनतेच्या आणि तरुणांच्या आपेक्षेचा महाविकास आघाडी सरकारने आपेक्षाभंग केला आहे. 2014 पासून थांबलेली नोकरभरती सुरु होईल, पोर्टल मध्ये भ्रष्टाचार आहे तो बंद होईल, अनुशेष भरला जाईल आमच्या पोराला नोकरी मिळेल अशा आपेक्षा 2019 पासून सर्वांनाच लागल्या होत्या. पण सर्व काही निराशामय आहे.  याचा कळस म्हणजे काल स्वप्नीलने आत्महत्या केली,  सभागृहात चर्चा मात्र 12 आमदारांचीच झाली. पण तरुणांचे १२ कोणी वाजवले यावर कोणीच बोलत नाही.  उठ-सुठमहाराष्ट्र नं. 1 आहे म्हणून ‘जय महाराष्ट्रर' म्हणणाऱ्यांनी  थोडं बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश कडे बघावं अशी  म्हणायची वेळ आली आहे का? 


उठसुठ बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांना दोष देणारे महाराष्ट्र सरकार जनतेची दिषाभूल करत आहे. बिहारी आणि युपीचे लोक महाराष्ट्रात रोजगार मागायला येतात असे टोमणे मारते आहे. परंतु ते हे लक्षात घेत नाही की, युपी असो की बिहार लोकसेवा आयोगाचे काम महाराष्ट्राच्या कितीतरी पुढचे आहे. इतकेच नव्हे तर या राज्यात प्राध्यापक  भरती देखिल आयोगाच्या मार्फतच होते. शिवाय मागच्या दोन वर्शात जे युपीएससी चे निकाल लागले त्यात 1700 पैकी 1000 हून अधिक यशस्वी विद्यार्थी हे एकटया बिहारचे आहेत. शिवाय महाराष्ट्रात 2012 पासून प्राध्यापक भरती बंद असताना म/यप्रदेष, बिहार, उत्तर प्रदेष या राज्यांनी आयोगाच्या मार्फत हजारो प्राध्यापकांची भरती मागच्या दोन वर्षात केली आहे. आज महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या केंद्रीय लाकसेवा आयोगामार्फत आलेल्या अधिकाऱ्यांवर एक नजर टाकली तर यात सर्वाधिक अधिकारी हे बिहारचेच आहेत.

    तरीही आम्ही बिहार, उत्तर प्रदेष, मध्यप्रदेश  यांच्यापेक्षा प्रगत आहोत हेच आमचे सरकार सांगत आले आहे. 2019 ला सत्तेत आल्यावर एक महिन्याच्या आत पोर्टल बंद होईल असे आश्वासन  काही नेत्यांनी दिले होते. आज दोन वर्ष  पूर्ण होत आले आहेत. पोर्टल बंद करणे तर सोडाच, पोर्टल हा शब्द देखिल ते उच्चारत नाहीत. निवडणूकीपूर्वी नोकरभरतीची दांडगी आश्वासने दिली गेली. त्यावर कोणीही बोलत नाही. मागच्या दोन वर्षापासून एकच चर्चा आहे. सरकार टिकेल की पडेल. संजय राउत आणि शरद पवार दररोज बोलतात सरकार टिकेल, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणविस म्हणतात सरकार पडेल आणि काॅंग्रेसचे नेते म्हणतात आम्हाला काही फरक पडत नाही. आणि या तिघांच्याही बातम्या ब्रेकिंग  न्यूज म्हणून महाराष्ट्राची 10 कोटी जनता बघते आहे. दोन वर्ष झाले ते बोलतात, मध्यमे बातम्या देतात आणि आम्ही बघतो आहे.

    12 आमदारांची यादी हारवली म्हणून चिंता करणारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमत्री अजीत पवार, संजय राउत आणि या सर्वांचे सर्वेसर्वा शरद पवार किमान आठवडयातून एकदा तरी बोलतात आणि त्याच्या मोठ मोठया बातम्याही होतात. पण दोन वर्षपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची यादी हारवली आहे यावर यातले कोणीही बोलत नाही. त्यांना ही यादी महत्वाची वाटत नाही का? या व्यतिरिक्त 12 आमदारांची यादी हरवली म्हणून संपादकीय लिहणारे यावर साधी बातमीही लिहित नाहीत. असं सरकारचं कोणतं काम या 12 आमदारांमूळे आडलं आहे. ज्याच्यामूळे सरकारचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आतोनात नुकसान झाले आहे. यावर किमान एक तरी लेख संजय राउत यांनी ‘सामना’ मधून लिहला पाहिजे. पण ते लिहणार नाहीत. कारण सरकार बनणार, टिकाणार आणि असेच पाच वर्ष जाणार हीच आपेक्षा संजय राउत यांची आहे आणि त्यासाठी ते जीवाचे रान करुन हाॅस्पीटलमध्ये  अॅडमीट होउनही लिहीत असतात. पण पत्रकार या नात्याने ते आम्हा तरुणांच्या प्रश्नावर काहीच लिहीत नाहीत आणि लिहणारही नाहीत.

    आज सरकारच्या याच भूमिकेचा निशेध म्हणून स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. खरे तर त्यांनी आत्महत्या केली नाही तर, तू एमपीएससी का करतो? असा प्रश्न विचारुन त्याला फासावर लटकवले आहे.  इथून पुढे सरकारकडे नोकरी मागणाऱ्यांची आवस्था स्वप्नीलसारखीच होणार आहे. कारण सरकार हे जनतेसाठी असते हे सरकारमधील लोकही विसरलेत आणि जनताही हे विसरुन गेली आहे. त्यामूळे सरकारी नोकरीचे प्रत्येक मैदान हे तरुणांसाठी स्मशान  बनत चालले आहे. 



    खरे तर लोकप्रतिनिधींनी तरुणांचे माय-बाप कसे होता येईल याचा विचार करावा. मागच्या अनेक दिवसापासून 12 आमदारांची यादी हरवल्याचे दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा  दोन वर्षपासून हरवलेली एमपीएससीची यादी शोधली असती तर आज स्वप्नीलने आत्महत्या केलीच नसती.

 खरे तर, फडणवीस सरकारने मागच्या ५ वर्षात नोकर भरती बंद करून तरुणांच्या आयुष्याचे १२ वाजवले म्हणून तरुणांनी नवीन सरकार निवडून दिले.  पण याही सरकारने वेगळे काही केल्याचे दिसत नाही. हेही १२ आमदारांच्या चर्चेच्या पुढे जाऊ शकले नाही. एखाद्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आभाळाकडे बघावे तसे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण अजूनही १२ मतीकडे डोळे आणि कान लावून बसलेले आहेत.  १२ आमदारांचा प्रश्न बाजूला ठेऊन तरुणांचे १२ कोणी वाजवले यावर ते  नक्कीच विचार करतील.  कारण ते जाणते राजे आहेत  यावरच सद्या तरुणाई चर्चा करत आहे.  


हेही वाचा 

फुले, शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन दुकानदारी 

 दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख

छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय?  

No comments:

Post a Comment