... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !
डॉ. ह. नि. सोनकांबळे
धर्मनिरपेक्षता हा शब्द भारताच्या संविधानात संविधान सभेने टाकलेला नाही हे आपल्याला माहीतच आहे. ४२ व्य घटनादुरुस्तीने हा शब्द १९७६ ला संविधानाच्या उद्देशपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला. असे असले तरी भारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमात धर्मनिरपेक्षता दडलेली आहे हेही मान्य करावे लागते. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील आपला राज्यकारभार धर्मनिरपेक्ष पद्धतीनेच चालावा अशी इच्छा व्यक्त केली होती आणि ते या तत्वाचे पालन करण्याचा कसोशीने प्रयन्त करायचे.
राज्यकारभार करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अनेक वेळा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे प्रसंग आले. पण त्यातूनही त्यांनी आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत याचा विसर पडू दिला नाही. राजकीय खुर्चीवर बसलेल्या वयक्तीने धार्मिक कार्यक्रमात सहभागी होवू नये असे नेहरु नेहमी सांगायचे. ते म्हणायचे की, प्रत्येक व्यक्तीचे आपापल्या धर्मावर, तिर्थक्षेत्रावर खूप प्रेम असते त्याचे पालनही केले पाहिजे पण त्याला धार्मिक रुप येता कामा नये.
No comments:
Post a Comment