Monday, April 10, 2023

आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?


  आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने निलेश कराळे आणि विठ्ठल कांगणे या दोन कॉमेडी शिक्षकांची मागाणी भाषणांसाठी वाढत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दिवसेंदिवस मनोरंजनाकडे वळत चालली आहे याचे हे द्योतक आहे. पण खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इतकी मनोरंजक आहे का? याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. 

 
    2014 मध्ये एका कार्यक्रमात अरुधती रॉय असं म्हणाल्या होत्या की, ‘आम्हाला डॉ. आंबेडकर गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मनोरंजन नाही तर ती शोषीत, वंचीत समुहाच्या न्यायाची लढाई आहे आणि कोणतीही लढाई लढत असताना आपण जर विनोद करत बसलो तर त्या लढाईचे परिणाम काय होतील यावर जास्त सांगण्याची गरज नाही. 

 
    मागे काही दिवसांपूर्वी विद्रोही मराठी साहित्य सम्मेलनातही गर्दी जमवण्यासाठी आयोजकांनी निलेश कराळे यांना सम्मेलनाचे स्वागत अध्यक्ष केले आणि त्यातल्या एका विचारमंचाला “फुले-शाहू- आंबेडकर” विचारमंच असे नाव दिले. माझ्या दृष्टीकोणातुन हा फुले शाहू आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळीचा फार मोठा अपमान आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पट्टे बापूराव, दिलीप कुमार अशा मनोरंजन करणा­या लोकांना साधे जवळही थांबू दिले नाही. त्यांच्याच नावावर आज मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विद्रोही मराठी साहित्य सम्मेलन तरी गांभीर्याने घेतले जात असावे असे मला इतके दिवस वाटत होते पण विद्रोह देखील मनोरंजनाकडे वळला आहे असेच सध्या तरी दिसते आहे. 

 
    निलेश कराळे कोण? याचा शोध घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की, त्यांनी “बुलेट चालू घडामोडी” नावाचा एक महान ग्रंथ लिहला आहे आणि तो ग्रंथ विद्रोही मराठी साहित्यिकांना एवढा आवडला की बस्स…! त्यांना त्यांनी फुले-शाहू-आंबडकरी चळवळीचा नयक ठरवून टाकले. आज तेच आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या स्टेजवरून लोकांचे मनोरंजन करू लागले आहेत. 

 
    बे डोंमड्याहो, काचा-कचा, डुक­याहो, रान डुकरीन, कचकन, बुडया-टकल्या, साल्या, देऊ काय कोपच्यात, जा ना मरून, लिचोंड, ढस, धुस, फुससस, वानर तोंडया, बदमास लोकहो, भिकारवाडा, मारन भोकनेवा, पोट्टी जाते पोट्यासोबत फिरायले या आणि अशा अनेक शब्दातला निलेश कराळे यांचा विद्रोह कदाचित विद्रोही साहित्यिकांना जास्त आवडला असावा. तोच विद्रोह आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मंडळाला देखील आवडू लागला आहे. म्हणूनच की काय त्यांच्या तारखा देखील मिळणे सध्या कठीण झाले आहे. 

 
    तुम्ही जर या चळवळीतले दुसरे भाष्यकार बघितले तर त्यांचे नाव आहे विठ्ठल कांगणे, सध्या तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी चळवळीचे भाष्यकार म्हणून बोलू लागले आहेत. ते बोलणारच कारण जयंती समितीचा आग्रह आहे की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आणि मग ते मार्गदर्शन करायला येतात. तुम्ही जर यांचे नाव युटयुब ला सर्च करायला गेलात आणि विठ्ठल कांगणे असं सर्च केलं तर पुढचे शब्द फुल्ल, मोक्कार कॉमेडी असं आपोआप येतो. 

 
    ये दलिंदरा, बब्या, गौतमी पाटल, तु निराधार बायांच्या घरी बसतो, तोंडावर उलटी झापड देईन, क्लास करता करता पोरगी पटली, तुया बापाला आधी हाणलं पाहिजे, मग तु अंडरविअर विक अशे अनेक शब्द यांच्या तोंडून सातत्याने येतात. ही भाषा ऐकणारा आणि त्यांचे अनुकरण करणारा यांचा एक मोठा वैचारिक चाहता वर्ग आपल्याला पहावयास मिळतो. त्यामुळे या वर्गाची मागणी पुर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा मंच सध्या यांच्यासोबत शेअर केला जातोय. 

 
    लोक येतात, ऐकतात, पोट धरून हसतात आणि अशा पध्दतीने मग जगातल्या सर्वात महान विव्दान व्यक्तीची जयंती साजरी केली जाते आणि आम्ही कोणीच काही बालत नाही. आता वेळ आली आहे हे सर्व थांबवण्याची.

 
जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक दोन फोटो सोडले तर कुठेच हसताना दिसत नाहीत, कुठेच एखाद्या भाषणात जोक सांगताना दिसत नाहीत. किंवा कुठेच मनोरंजन करतानाही आढळत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावच इतकं सिरियस आहे की, हे नाव घेतांना मोठ मोठे विव्दान माणसांचे चेहरे गंभीर रूप धारण करतात. पण हे गांभीर्य मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणाऱ्यांना  आणि त्यांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनाच सध्या राहिले नाही.
पण आपण जर खरेच स्वत:ला डॉ. बाबासाहेब आंबेडरांचे अनुयायी किंवा वारस म्हणून घेत असू तर आपण हे सर्व थांबवले पाहिजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांभीर्याने समजून घेतले पाहिजेत. अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेही बाजारात विनोद/जोक यायला वेळ लागणार नाही. 

 
    तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला असे कार्यक्रम  जे  लोक आयोजित करत आहेत त्यांना थांबवा, त्यांना ही चळवळ किती सिरियस आहे हे सांगा. समाजाचा पैसा आणि वेळ यात व्यर्थ जातोय हेही पटवून सांगा. वाटलं तर जयंती क करू नका पण पण जयंतीच्या नावावर होणारा हा तमशा थांबवा अशी हात जोडून विनंती करा आणि ऐकतच नसतील तर ………! पुढचा निर्णय तुम्हीच घ्या. 

 

कारण महामानवांची जयंती महामानवांची जयंती वाटली पाहिजे. तिचा एक वेगळाच थाट असला पाहिजे. केवळ गर्दी जमवण्याच्या नावाखाली उद्या तमाशे होऊ देऊ नका.   

 

 हेही वाचा

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"  

 

रिझर्व बँक, लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  

जागतिक चर्चाविश्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 

 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि LIC चे राष्ट्रीयकरण  

 

अमेरिका-इंग्लंड-भारतीय संविधान आणि स्त्रिया  

 

स्वातंत्र्यापुर्वीच संविधानाचे 7 मसुदे तयार होते?  


Thursday, April 6, 2023

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

विनंती - ब्लॉग पेज ला फॉलो करायला विसरू नका.

 
आपल्या गावात केसांवर – काटे, फुगे, पिना, टिकल्या विकणारे रोजच पहायला मिळतात. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या रोजच्या विंचरण्याच्या केसातून अशा वस्तू खरेदी करतात. आता तर केसांवर भांडे आणि इतरही महत्वाच्या घरगुती वस्तु मिळतात. या वस्तू विकत घेतांना आपण त्या विक्रेत्यांना कधीच विचारत नाही की, हे केस किती रूपये किलो ने विकले जातात? पण या केंसांची किंमत आणि जगभरातील मार्केटचा विचार केला तर तुम्ही थक्क व्हाल.  



केसांची निर्यात करणारा भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. अनेक वर्षापासून जगभरात भारतीय केसांची प्रचंड मागणी राहील आहे. दरवर्षी जवळपास 165 मिलियन डॉलरच्या केसांची निर्यात भारतातून होते. या सर्व रकमेचा आकडा जर भारतीय रूपयांमध्ये बघितला तर 13,56,08,55,000.00 इतका होतो. भारताबरोबरच इतरही देश केसांची निर्यात करतात. परंतु भारतातून सर्वात जास्त केसांची निर्यात केली जाते.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, भारतच केसांच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर कसा काय? याचे साधे उत्तर आहे की, भारतात अशा काही धार्मिक प्रथा आणि परंपरा आहेत त्यात केसांचे दान केले जाते किंवा केस देवाला अर्पण केले जातात. 



भारतात अनेक वर्षापासून केशवपनाची प्रथा चालू होती असे आपण ऐकले असेल किंवा वाचलेही असेल. शिवाय तिरूपती बालाजी मंदिरात अनेक भक्त देवाला केस दान करतात. तुम्ही जर तिरूपतीला कधी गेलात तर तुम्हाला असे हजारो लोक देवाला केस दान करताना दिसतील. इतके लोक केस दान करणारे असताना देखील तिथे रस्त्यावर किंवा कच­यात कुठेही केस आढळून येत नाहीत. मग साधा प्रश्न पडतो की, हे केस नेमके जातात तरी कुठे?
याचे साधे सरळ उत्तर आहे या सर्व केसांची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि हे केस लाखोंच्या भावाने परदेशात विकले जातात. 



भारता बरोबरच इतरही काही देश असे आहेत जे केसांची निर्यात करतात. त्या देशांचा क्रमांक अनुक्रमे खालील प्रमाणे लागतो. 


केसांची निर्यात करणारे भारतातील प्रमुख देश – 2021


खालील आकडे दशलक्ष युस डॉलरमध्ये आहेत.(in million U.S. dollars)


1. भारत - 165 (in million U.S. dollars)

2. हाँग काँग – 4.1
3. पाकिस्तान – 2.2
4. ब्राझील – 2.1
5. अमेरिका – 0.92
6. इंडोनेशिया – 0.8
7. व्हिएतनाम – 0.66
8. चिन – 0.53
9. जापान – 0.51
10. नेदरलँड - 0.41

भारतातून होणा­या केसांच्या निर्यातीत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यातून जास्त केसांची निर्यात केली जाते. 



भारतात दोन प्रकारचे केसा गोळा केले जातात एक रेमी आणि दुसरे नॉन रेमी केस. रेमी केस हे सर्वोत्तम आणि चागल्या दर्जाचे केस असतात जे मंदिरामधून गोळा केले जातात जिथे लोक धार्मिक भावनेतून देवाला किंवा देवीला केस दान करतात. ज्याचा उपयोग विग साठी किंवा इतर प्रकारच्या केस रचनेसाठी करतात तर नॉन रेमी केस हे खेड्यापाडयातून कच­याच्या रूपात जमा केले जातात. 


काही दिवसांपूर्वी भारत सरकारने केंसांच्या निर्यातिवर बंधने घालून दिली आहेत. पुर्वी केसांची निर्यात करण्याकरीता कोणतीही बंधने नव्हती मात्र आता निर्यातदाराला वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यरित असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड कडून परवानगी किंवा परवाना घ्यावा लागतो. 

 

हेही वाचा 

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया" 

 

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला.  

 

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !  


Saturday, April 1, 2023

ambedkar podcast Series : देशातल्या ३६ प्लॅटफॉर्म वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० पैलू

 
 
 
ambedkar podcast Series : देशातल्या ३६ प्लॅटफॉर्म वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० पैलू 
 

 यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने एका नवीन उपक्रमाची सुरूवाम करण्यात आली आहे. या मध्ये छत्रपती शिवाजी महराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या पाच महापुरूषांचे ििवचार नवीन पिढीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोहोचवण्यासाठी ऑडिओ पॉडकास्ट सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. ही ऑडिओ पॉडकास्ट सिरीत श्रोतावर्गाला आवडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महापुरूषांचे विचार युवा पिढी पर्यंत पोहचवण्याचा चव्हाण सेंटरचा मानस सफल होताना दिसतो आहे. 


    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट नवीन विषयांसह डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी उलगडून सांगितला आहे. त्यांचे विचार 10 एपिसोडच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. 


    हे सर्व एपिसोड
Apple Podcast, Google Podcast, Amazone Music, Gaana.com, Savan.com, Spotify यशवंतराव चव्हाण सेंटरची वेबसाईट/ फेसबुक पेज/ इन्स्टाग्राम/ व्टिटर यांसह 36 हून अधिक प्लॅटफॉर्म वर ऐकायला मिळतील. 


    ambedkar podcast आपण खलील दिलेल्या टायटल लिंकवर क्लिक करूनही ऐकू शकता.

इथे क्लिक करा :

 

1. इथे क्लिक करा : भारताचे परराष्ट्र धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

2. इथे क्लिक करा : स्वातंत्र्यपूर्वीचे सात संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

3. इथे क्लिक करा :शेती आणि आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

4. इथे क्लिक करा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश 

 

5.इथे क्लिक करा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'ट्रेंनिग स्कुल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स' 

 

6. इथे क्लिक करा :इन्शुरन्सचे राष्ट्रीयीकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

7. इथे क्लिक करा :आरक्षण : एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी 

 

8. इथे क्लिक करा :ब्रिटिश पार्लमेंटचे 'द आंबेडकर प्रिन्सिपल्स 

 

 

 

 ambedkar podcast