Wednesday, September 8, 2021

सरकारची बतावणी - तमाशाहून चांगलीच



सरकारची बतावणी - तमाशाहून चांगलीच 


डॉ. ह. नि. सोनकांबळे 


प्रेक्षकांना हसवत खेळवत ‘तमाशा’ला पुढे सरकावणे या प्रकाराला ‘बतावणी’ असे म्हटले जाते. हाच प्रकार सध्या राजकारणात सुरु झाला आहे.  प्रेक्षकांना हसवत खेळवत, त्यांचे मनारंजन करत पाच वर्ष राज्य करणे याला ‘सरकार’ असे म्हणतात. तमाशात बतावणी ऐकताना जसे प्रेक्षक आपलं सगळं दुःख विसरुन जातात. तोच प्रकार सध्या आपल्यासोबत केला जातो आहे. सरकारमधले लोक रोज असा एक विषय आणतात आणि आपण आपले सर्व प्रश्न विसरुन जातो. 

केंद्रात सत्तेत असलेले लोक राज्याच्या सरकारवर सोबत बतावणी करतात तर राज्यात सत्तेत असलेले लोक केंद्रासोबत बतावणी करतात. तमाशाच्या बतावणीत एखा जोरदार पंच आलाच तर लोक टाळया आणि शिटया वाजवतात. तर केंद्र राज्य यांच्यातल्या बतावणीत पंच आलाच तर लोक सोशल मिडीयावर ‘दात’ काढतात. 

आपल्याला हसायला मिळालंय एवढयातच सध्या लोक समाधानी आहेत. काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर-अमोल मिटकरींनी मंच गाजवला, त्यानंतर नारायण राणे केंद्रात मंत्रीपद मिळवून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रात येवून जोरदार ‘बतावणी’ला सुरुवात केली. त्यांनी दरेकारांना ‘तु गप रे मध्ये बोलू नको’ असे म्हटले आणि पोटयांचे  आठ दिवस आनंदात गेले. त्यात पुढे लगेच अनिल परबांचा फोन मिडीयासमोर सुरु झाला आणि नारायण राणेंना अटक झाली की नाही हे बघण्यात पुन्हा पोटयांचे तीन दिवस गेले.  यात लगेच काल ‘किलीट सोमया’ ने उडी घेतली. आणि ‘लवकलच मुख्यमंत्ल्याच्या मागे ‘ईली’ लावू’ असे सांगून पुन्हा पोटयांच्या फेसबुकला रंग भरवला. आज पुन्हा ते झेड सुरक्षा घेउन अॅक्षन मध्ये आले आहेत. त्यांच्या सुरक्षेवर 60 लाख रुपये खर्च होणार आहे.

परवा करुणा ने परळीत येवून ‘कारुण्य’ दाखवले. पोट्टे  तिच्या गाडीच्या मागे पळून पळून थकले. मध्येच अॅट्राॅसिटी चा गुन्हा दाखल झाला. आज पोलीस करुणा शर्माच्या मुबईतल्या घरी गेलेत. तिकडे मोहन भागवतांनी ‘सर्व मुस्लिम हे हिंदू आहेत’ असे म्हटले तर दुसरीकडे शरद पवारांनी ‘त्यांच्या मुळे माझया ज्ञानात भर पडली’ असे सांगून रान हाणले. तर तिसरीकडे गुणवरत्न सदावर्तेंनी ‘दिलीप वळसे आणि शरद पवारांना अटक करा’ असी मागणी करुन चर्चेला नवे वळण दिले. 

दुसरीकडे आधुमधून कार्यक्रमात जाहीरात आल्यासारखे 12 अमदारांचा प्रश्न येतोच. परावा त्यातून राजू शेट्टीचे  नाव वगळल्याच्या बातम्या आल्या तर त्यावर सदाभाउ खोत, राजू शेट्टीला म्हणाले, ‘कशीला चालत जा आणि माझी काशि झाली म्हणून सांगण.’

हा सर्व प्रकार बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की, तमाशातल्या बतावणीत आणि सरकारच्या बतवाणीत काहीच फरक नाही. तिथेही लोक आपले दुःख, प्रश्न विसरुन जातात आणि शिटया वाजवतात टोप्या उडवतात. इथेही लोक गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, बेकारीत होणारी वाढ, भरतीप्रक्रियेचा प्रश्न हे सर्व दुःख, प्रश्न विसरुन चालले आहेत. गेली एक महिन्यापासून उच्च शिक्षीत मुले नोकर भरती प्रक्रिया सुरु करा म्हणून पुण्यात उपोषणाला बसलेत. तिकडे कोणीच फिरकत नाही. मात्र 12 आमदारांची निवड प्रक्रिया रखडली म्हणून डझनावर नेते राज्यपालांना भेटायला जातात. तरीही आम्हाला आनंद आहे की, आम्ही लोकशाहीत आहोत. 

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. भाजप चे सरकार देशात आहे. आनंदच आनंद आहे. कोरानामूळे नाटयगृह, तमाशे बंद असले म्हणून काय झालं. तुमच्या मनोरंजनात तीळमात्र कमतरता आलेली नाही. दोन्ही सरकारे खूप चांगली आहेत. फक्त आनंद घेता आला पाहिजे. ज्यांना या सर्व गोष्टींचा आनंद घेता येत नाही ते सर्व देशद्रोही आहेत आणि ज्यांना घेता येतो ते सर्व लोकशाहीवर प्रेम करणारे आहेत. 

ज्यांना यातलं काहीच कळत नाही किंवा देणंघेणं नाही. त्यांच्यासाठी सरकारची नवी स्किम ‘लाईक, काॅमेंट, शेअर आणि सब्सक्राईब’ उपलब्धच आहे. कोणतेही चार्जेस नाहीत. त्यामूळे ‘बतावणी’ला जनतेचा जोरदार प्रतिसाद तर मिळणारच आहे. कारण ही सरकारची बतावणी आहे, जी तमाशाहून चांगली आहे.

Thursday, August 19, 2021

प्रत्येकालाच जमायला हवे "नात्यांचे सर्व्हिसिंग"

 


जिथे ‘अर्थ’ (पैसा) आहे तिथे ‘स्वार्थ’ आहे आणि जिथे ‘स्वार्थ’ आहे तिथे ‘नाते’ कधीच टिकून राहत नाहीत हा प्राचिन इतिहास आहे. म्हणूनच प्रसिद्ध राजकीय चिंतक मॅकिव्हली असे म्हणाला होता की, ‘लोक एकवेळेस आपल्या बापाचा मृत्यू विसरतील पण पैसा विसरत नाहीत.’ थाॅमस हाॅब्ज या विचारवंताने देखिल त्याच्या ‘लेवियथान’ या ग्रंथात मनुष्यस्वभाव हिंस्र, दांभाीक आणि स्वार्थी असल्याचे स्पष्टपणे सांगीतले.  जस-जसा काळ बदलला तस-तसे माणसांचे स्वभाव, नाते, संबंध सर्वच बदलत गेले पण माणूस आणि पैसा यांच्यातले संबंध म्हणावे तेवढे बदलले नाहीत. बदललेही असले तरी ते सैल स्वार्थी पणाकडून घट्ट स्वार्थी पणाकडे गेले असतील. पण यात काही अपवाद असेही आहेत की, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आला पण स्वभाव मात्र स्वार्था कडून परमार्थाकडे गेला. यात विश्वास ठाकूर यांचे नाव आजच्या काळात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नुकताच त्यांचा ‘नात्यांचे सव्र्हिसिंग’ हा कथा संग्रह प्रकाशित झाला असून त्यांच्या या कथासंग्रहात त्यांचा हा स्वभाव पडद्यामागे असल्याचे दिसत. कारण त्यांनी एकाही कथेमध्ये  ‘मी’ किती श्रेष्ठ आहे असे दाखवून दिले नाही. 

पैसा हा आहेरे वर्गाचा धर्म आहे. ज्याचे तत्वज्ञान हे ‘भेदाभेद’ आहे. पण एका बॅंकेचे विश्वस्त (मालक) असूनही विश्वास ठाकूर या तत्वापासून कोसो दूर राहिल्याचे त्यांच्या या कथासंग्रहातून दिसून येते. कार्ल मार्क्स म्हणाला होता की, भांडवलदार आणि कामगार यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे. पण मार्क्सचे हे तत्वज्ञानही विश्वास ठाकूर यांनी मोडीत काढल्याचे दिसते. त्यांच्या या कथासंग्रहात जिथे-जिथे बॅंकेच्या कर्मचार्यांचे संदर्भ आले आहेत तिथे-तिथे मालक आणि कामगार असा संबंध कुठेच प्रदर्शीत होत नाही. एका बॅंकेेचे मालक असूनही त्यांनी जो कर्मचारी आणि जनतेचा जिव्हाळा जपला आहे त्यातून एक वेगळाच मनुष्यस्वभाव पुढे येताना दिसतो आहे. त्यांच्या संपर्कात  सर्वच लोक चांगले (निस्वार्थी) आले आहेत असे नाही. पण ते जरी तसे असले तरी त्यांच्या स्वभावात देखिल बदल होईल या आपेक्षेने विश्वास ठाकूर यांनी त्यांच्यातील स्वभावाचेही ‘सर्व्हिसिंग’ करुन नाते जोडण्याचे धाडस  केले आहे. 

खरे तर अनुभव कथन करणे ही तशी अवघड बाब असते. एखादे वेळी माणूस सोयरीक, लग्न, पर्यटन अशा ठिकाणचे अनुभव कथन करु शकतो. पण जिथे रोज आर्थिक व्यवहार घडत होतेे अशा ठिकाणचे अनुभव कथन करण्यासाठी मोठे धाडस लागते. हे धाडस विश्वास ठाकूर यांनी दाखवले आहे. त्यांनी कथन केलेले अनुभव हे फक्त निस्वार्थी लोक भेटले अशा अशयाचे नाही तर सर्वच प्रकारच्या लोकांचा संबंध आल्याचे वास्तव त्यांनी मांडले आहे. हे सांगत असताना अनेकांच्या ‘नात्यांचे सव्र्हिसिंग’ करता आले नाही याचे दुःखही त्यांनी मांडले आहे. 

विश्वास ठाकूर यांचा हा कथसंग्रह वाचल्यानंतर एक महत्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे, त्यांना नात्याचा भागाकार आणि वजाबाकी कधीच जमली नाही. त्यांनी केवळ नात्यांची बेरीज आणि गुणाकार केला आहे. या साठी त्यांनी ‘सर्व्हीसिंग’चे जे सूत्र वापरले आहे ते वाचकांना या कथासंग्रहात भावल्याशिवाय राहत नाही. खरे तर ही मेथड आपल्या प्रत्येकालाच जमली पाहिजे. या कथा वाचल्यानंतर वाचकांचा हाच प्रयत्न राहणार आहे की, आपणही ही ‘सर्व्हिसिंग’ची मेथड आपल्या आयुष्यात वापरली तर नात्यांची कुठेच कमतरता भासणार नाही. आज तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले तरी आपल्या बाजूला बसलेल्या माणसाशी आपला संवाद होत नाही. आपल्या कुटंुबात आपण एकमेकांच्या बाजूला बसून जेवण करत असलो तरी संवाद होत नाही. या काळात खरेच आपल्या प्रत्येक ‘नात्याचे सर्व्हिसिंग’ झाले पाहिजे त्यासाठी हा कथासंग्रह ‘नात्यावर’ प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. 

विश्वास ठाकूर यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे असे वाचताना कुठेच जाणवत नाही. त्यांची भाषा, संवादशैली, मांडणी एखाद्या जेष्ट लेखकाची वाटते. या कथासंग्रहात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच कथा आल्या नसल्या तरी येणाऱ्या काळात ते पुन्हा एखादा कथासंग्रह वाचकांसाठी घेवून येतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावी लेखनास मनःपुर्वक शुभेच्छा!



आपला नम्र, 

डाॅ. ह. नि. सोनकांबळे

राज्यशास्त्र विभाग, 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद 

मो. नं. 9403973043 / 23

Wednesday, July 21, 2021

सिद्धार्थ गोदाम: चळवळीचं महाकव्हरेज




सिद्धार्थ गोदाम: चळवळीचं महाकव्हरेज 

@डॉ. ह. नि.  सोनकांबळे

दुष्काळ पडला म्हणून आपली जनावरे विकायला घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारा ‘मला विकू नका’ या विशेष शो साठी मागच्या वर्षी सिद्धार्थ गोदाम यांना राष्ट्रीय पातळवरील इएनबीए पुरस्कार मिळाला. याही वर्षी पुन्हा दुसऱ्यांदा हाच पुरस्कार त्यांना ‘बेस्ट करंट अफेयर्स’ विभागातून  प्रप्त झाला आणि काल पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार त्यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

असं म्हणतात की, ‘तुम्हाला जर जगाच्या हृदयाजवळ जायचं असेल तर पत्रकार बनने हा एकमेव मार्ग आहे.’ पण हल्ली असे खूप कमी पत्रकार आहेत जे लोकांच्या हृदयाजवळ पोहचतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी झिजवतात. खरे तर पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमातूनच हा धडा वगळण्यात आला आहे. पत्रकारीता म्हणजे प्युअर बिझनेस होवून बसला आहे. अभ्यासक्रमात देखिल जाहीरात कशी मिळवायची, कोणत्या बातमीला जास्त महत्व द्यायचं, पेड न्यूज कशा छापायच्या, कोणत्या बातमीतून जास्त बिझनेस मिळू शकतो, जे लोक आपल्याला जास्त बिझनेस देतात त्यांनाच कसे कव्हरेज द्यायचे, याचेच धडे प्रामुख्याने दिले जातात. परंतु अशा काळात देखिल एक दिलासादायक चित्र म्हणजे काही पत्रकार या सर्व वातारणापासून दूर आहेत. याच यादीत एक नाव घ्यावं लागेल ते म्हणजे, आयबीएन 18 लोकामत चे पत्रकार, मराठवाडा ब्युरो चिफ सिद्धार्थ गोदाम यांचं.  

एरवी पत्रकारीतेचं माईक हातात घेवून लांबलचक बडबड करण्यात अनेक पत्रकारांचा वेळ जातो. परंतु ‘मी जास्त बोलण्यापेक्षा चला थेट परिस्थितीतच दाखतो’ हेच सूत्र सिद्धार्थ गोदाम यांच्या पत्रकारीतेचं राहिलं आहे आणि म्हणूनच ते आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाजवळ पोहचले. चळवळी, आंदोलने, मोर्चे, शेतकरी आत्महत्या, विद्याथ्र्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नावरचा त्यांचा अभ्यास आणि त्याचे रिपोर्टींग करण्याची शैली इतरांपेक्षा निराळीच. काही दिवसापूर्वी परभणीच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी ती बातमी एक किंवा दोन काॅलमपेक्षा जास्त छापली नाही. त्यामूळे सर्वांनीच या बातमीकडे एक साधारण घटना म्हणून बघितले. परंतु याचं रिपोर्टींग जेव्हा सिद्धार्थ गोदाम यांनी न्यूज 18 लोकमत ला केलं तेव्हा यातली दाहकता शासन, प्रशासन व जनतेच्या लक्षात आली. त्या शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची असल्याचे महाराष्ट्राच्या लक्षात आले. दोन्ही कानाचे आॅपरेशन झालेली शेतकऱ्याची पत्नी, कापूस वेचायला जावून शिक्षण घेणारी मूलगी आणि इतर लहान भावंडं असा त्याचा परिवार. खरे तर अशा कुटंुबांना न्याय देणारी पत्रकारीता सध्या लोप पावताना दिसते आहे. 

अशाच अनेक कुटंुबातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ येतात. तसे तर हे विद्यापीठ ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतक$यांच्या मुलांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठात येणारे अनेक विद्यार्थी हे शेतकरी आणि शेतमजूर कुटंुबातून येत असल्याने त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. हे प्रश्न प्रशासनाच्या आणि शासनाच्या दरबारी मांडून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा त्यांची पत्रकारीता कामी आल्याचे पहायला मिळाले. विद्यापीठात होणारे विद्यार्थी संघटनांचे आंदोलने, त्यांच्या मागण्यांना मिळणारे यश यात सिद्धार्थ गोदाम यांच्या योगदानाला बघावंच लागतं. कारण इतर कुठल्याही बतम्यांपेक्षा त्यांचा ओढा मोर्चे, आंदोलने व चळवळीच्या बातम्या देण्यावर आणि मागण्या लाावून धरण्यावर राहिला आहे. 


विद्यापीठात आणि मराठवाडयात कोणत्याही संघटनांचे मोर्चे असोत की, मागील काही वर्षापासून सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चे, बहुजन क्रांती मोर्चे, ओबीसी मोर्चे व धनगर समाजाचे मोर्चे असोत या सर्वच मोर्चांना त्यांनी दिलेले कव्हरेज कुठेही एका बाजूला झुकलेले दिसले नाही. त्यांची पत्रकारीता कोणत्याही एखाद्या संघटनेला, राजकीय पक्षाला किंवा जात समुदायाला अतिरिक्त महत्व देताना दिसत नाही. कोणत्याही संघटनेपेक्षा, पक्षापेक्षा किंवा जात समुदायापेक्षा त्यांच्या मागण्या आणि सर्वच समुहाला त्याच्यापासून होणारा फायदा यावर त्यांची पत्रकरीता प्रकाश टाकताना दिसते. 

खरे तर त्यांची माझी प्रत्यक्षात भेट कधी झाली नाही किंवा त्यांचा माझा परिचय देखिल नाही. परंतु खऱ्या पत्रकाराची ओळख ही त्याची लेखणी आणि त्यातून लिहली जाणारी बातमीच असते. बातमीला रंगवण्यापेक्षा त्या बातमीतले वास्तव दाखविणे आणि त्याचे योग्य परिणाम शासन आणि प्रशासनावर होणे हीच खरी पत्रकारांची ओळख असते. 

सिद्धार्थ गोदाम यांनी त्यांची ओळख त्यांच्या पत्रकारीतेतून निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यापूढेही त्यांची लेखणी समता, स्वातंत्रय, बंधुभाव आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी व त्यासाठी लढणाऱ्या चळवळींसाठी ‘महाकव्हरेज’ ठरेल यात शंकाच नाही. त्यांना हा पुरस्कार देवून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाने एका उत्कृष्ठ, धडाडीच्या पत्रकाराचे मनोबल वाढवले त्याबददल संघाचे व पुरस्कार मिळाल्याबददल सिद्धार्थ गोदाम यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सम्यक सदिच्छा !

Monday, July 12, 2021

सामाजिक न्याय विभागाला महापुरुषांच्या जयंतीचाही विसर


सामाजिक न्याय विभागाला महापुरुषांच्या जयंतीचाही विसर

डॉ. ह. नि. सोनकांबळे


काल परदेशातून एका मित्राचा फोन आला, म्हणाला, महाराष्ट्र शासनाने महापुरुषांच्या जयंत्यावर बंदी आणली की काय? मी म्हटलं नाही रे. तर म्हणाला, संकेतस्थळावर कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा फोटो दिसत नाही. 


लागलीच संकेतस्थळावर जाऊन बघितलं तर खरंच तिथे काहीच नाही. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय हे महत्वाचे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले. हे खाते त्यांच्याकडे देण्यामागचा उददेश बोलून दाखवत असताना शरद पवार म्हणाले होते की, ते खूप अॅक्टीव्ह असल्याने तेच हे खाते चांगले सांभाळू शकतील. या खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर धनंजय मुुंडे यांनी काही महिने आपल्या कार्याचा ‘कार्यअहवाल’ देखिल शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सादर केला आणि हा अॅक्टीव्हनेस काही दिवसातच बंद सुद्धा झाला. आता तुम्ही म्हणाल या नंतर कोरोना आला आणि धनंजय मुंडे यांनाही झाला. पण प्रश्न असा आहे की, काय त्यांच्या संकेतस्थळालाही कोरोना झाला होता का? कारण त्यानंतर हे संकेतस्थळ ऍक्टिव्ह झालेच नाही. 



महत्वाची गोष्ट म्हणजे या खात्याच्या संकेतस्थळावर गेल्यावर आपल्याला असे दिसेल की मा. धनंजय मुंडे खरंेच किती अॅक्टीव्ह आहेत. या खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी आपले सर्वांचे फाटो तत्काळ अपलोड करुन घेतले. यात मा. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, स्वतः धनंजय मुंडे, राज्यमंत्री म्हणून असलेले विश्वजीत कदम आणि या खात्याचे प्रधान सचिव श्याम तांगडे यांच्या फोटोचा समावेश आहे. परंतु नंतर या संकेतस्थळावर 2019 पासून ना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा फोटो आला ना इतर कोणत्या महापुुरुषाच्या



आपण जर या संकेस्थळावर जाउन पाहिले तर असे दिसेल की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीचे फोटो इथे देण्यात आलेले आहेत. तेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या काळातले आहेत. त्यानंतर या खात्याने कोणतेही फोटो अपलोड केलेले नाहीत. या संकेतस्थळावर गेल्यावर असे दिसते की, त्यानंतर या खात्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच साजरी केली नाही की काय? 


खरे तर या खात्याचे सकेतस्थळ महाराष्ट्रातच नाही तर भारतासह जगभरातील अनेक लोक हाताळत असतात, या संकेस्थळाला भेटही देत असतात. परंतु या मंत्र्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. 


या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्याला असे दिसेल की, इथे 127 व्या जयंतीचे काही फोटो आहेत तर देवेंद्र फडणविस यांच्या काळातलाच पुरस्कार वितरणाचा एक 3 मिनीटाचा व्हिडीओ इथे आहे. या व्यतिरिक्त इथे काहीही नाही. हो पण जयंतीच्या नावाने मात्र या खात्याने 2 कोटीहून (यात विविध प्रसारमा/यमांना दिलेल्या जाहीरातींचाही खर्चाचा समावेश आहे) अधिक खर्च केला आहे. परंतु याच जयंतीचे दोन फोटो टाकायला धनंजय मुंडे विसरले आहेत. 


शरद पवार यांनी निवडलेल्या या अॅक्टिव्ह मंत्र्यांला समजून घ्यायचे असेल तर सामाजिक न्याय विभागाच्या या संकेतस्थळाला एकदा नक्की भेट द्या. किंवा या ब्लाॅग पेज वर येणारी विशेष लेखमाला नक्की वाचा.


वास्तव जाणून घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खालील संकेतस्थळाला भेट द्या. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

Thursday, July 8, 2021

55 हजार भारतीय व परदेशी वाचकांचे आभार.

उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर नक्की क्लिक करा. 


#भारत

#अमेरिका #इंग्लंड सह 18 देशातून अधिक देशात असलेल्या 4000 मराठी वाचकांसह 55 हजार वाचकांनी ब्लॉग ला भेट दिली आहे. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 






आपणही या लिंक वर 👇


drhanisonkamble.blogspot.com


जाऊन नक्की भेट द्या! या वाचक चळवळीत सहभागी व्हा! 🙏🙏🙏🙏🙏

Wednesday, July 7, 2021

१२ कोणी वाजवले ?



तरुणांचे १२ कोणी वाजवले ?

 डाॅ. ह. नि. सोनकांबळे

 

 

शरद पवार महाराष्ट्राला नवं वैभव प्राप्त करुन देतील अशी आपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. उध्व ठाकरे चांगलं काम करत आहेत महाराष्ट्राला आता चांगले दिवस येतील असेही लाक सुरुवातीला म्हणत होते. पण सुरुवातीपासूनच 12 आमदार हा विषय विनाकारण चघळला गेला. आज पुन्हा नव्या 12 आमदारांचा प्रश्न  निर्माण झाला आहे आणि जनतेच्या आपेक्षांचेही 12 वाजले आहेत. या १२ आमदारामुळे महाराष्ट्राचे कोणते प्रश्न आडले आहेत. त्यांची नियुक्ती झाली नाही किंवा बडतर्फ केल्याने जनतेचे असे काय नुकसान झाले आहे. याचे ऊत्तर कोणालाच सापडत नाही. म्हणून लोक आता  12 मतीवर प्रश्न  उपस्थित करत आहेत.

नवं सरकार येईल आणि काही तरी नवं होईल. या जनतेच्या आणि तरुणांच्या आपेक्षेचा महाविकास आघाडी सरकारने आपेक्षाभंग केला आहे. 2014 पासून थांबलेली नोकरभरती सुरु होईल, पोर्टल मध्ये भ्रष्टाचार आहे तो बंद होईल, अनुशेष भरला जाईल आमच्या पोराला नोकरी मिळेल अशा आपेक्षा 2019 पासून सर्वांनाच लागल्या होत्या. पण सर्व काही निराशामय आहे.  याचा कळस म्हणजे काल स्वप्नीलने आत्महत्या केली,  सभागृहात चर्चा मात्र 12 आमदारांचीच झाली. पण तरुणांचे १२ कोणी वाजवले यावर कोणीच बोलत नाही.  उठ-सुठमहाराष्ट्र नं. 1 आहे म्हणून ‘जय महाराष्ट्रर' म्हणणाऱ्यांनी  थोडं बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश कडे बघावं अशी  म्हणायची वेळ आली आहे का? 


उठसुठ बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांना दोष देणारे महाराष्ट्र सरकार जनतेची दिषाभूल करत आहे. बिहारी आणि युपीचे लोक महाराष्ट्रात रोजगार मागायला येतात असे टोमणे मारते आहे. परंतु ते हे लक्षात घेत नाही की, युपी असो की बिहार लोकसेवा आयोगाचे काम महाराष्ट्राच्या कितीतरी पुढचे आहे. इतकेच नव्हे तर या राज्यात प्राध्यापक  भरती देखिल आयोगाच्या मार्फतच होते. शिवाय मागच्या दोन वर्शात जे युपीएससी चे निकाल लागले त्यात 1700 पैकी 1000 हून अधिक यशस्वी विद्यार्थी हे एकटया बिहारचे आहेत. शिवाय महाराष्ट्रात 2012 पासून प्राध्यापक भरती बंद असताना म/यप्रदेष, बिहार, उत्तर प्रदेष या राज्यांनी आयोगाच्या मार्फत हजारो प्राध्यापकांची भरती मागच्या दोन वर्षात केली आहे. आज महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या केंद्रीय लाकसेवा आयोगामार्फत आलेल्या अधिकाऱ्यांवर एक नजर टाकली तर यात सर्वाधिक अधिकारी हे बिहारचेच आहेत.

    तरीही आम्ही बिहार, उत्तर प्रदेष, मध्यप्रदेश  यांच्यापेक्षा प्रगत आहोत हेच आमचे सरकार सांगत आले आहे. 2019 ला सत्तेत आल्यावर एक महिन्याच्या आत पोर्टल बंद होईल असे आश्वासन  काही नेत्यांनी दिले होते. आज दोन वर्ष  पूर्ण होत आले आहेत. पोर्टल बंद करणे तर सोडाच, पोर्टल हा शब्द देखिल ते उच्चारत नाहीत. निवडणूकीपूर्वी नोकरभरतीची दांडगी आश्वासने दिली गेली. त्यावर कोणीही बोलत नाही. मागच्या दोन वर्षापासून एकच चर्चा आहे. सरकार टिकेल की पडेल. संजय राउत आणि शरद पवार दररोज बोलतात सरकार टिकेल, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणविस म्हणतात सरकार पडेल आणि काॅंग्रेसचे नेते म्हणतात आम्हाला काही फरक पडत नाही. आणि या तिघांच्याही बातम्या ब्रेकिंग  न्यूज म्हणून महाराष्ट्राची 10 कोटी जनता बघते आहे. दोन वर्ष झाले ते बोलतात, मध्यमे बातम्या देतात आणि आम्ही बघतो आहे.

    12 आमदारांची यादी हारवली म्हणून चिंता करणारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमत्री अजीत पवार, संजय राउत आणि या सर्वांचे सर्वेसर्वा शरद पवार किमान आठवडयातून एकदा तरी बोलतात आणि त्याच्या मोठ मोठया बातम्याही होतात. पण दोन वर्षपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची यादी हारवली आहे यावर यातले कोणीही बोलत नाही. त्यांना ही यादी महत्वाची वाटत नाही का? या व्यतिरिक्त 12 आमदारांची यादी हरवली म्हणून संपादकीय लिहणारे यावर साधी बातमीही लिहित नाहीत. असं सरकारचं कोणतं काम या 12 आमदारांमूळे आडलं आहे. ज्याच्यामूळे सरकारचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आतोनात नुकसान झाले आहे. यावर किमान एक तरी लेख संजय राउत यांनी ‘सामना’ मधून लिहला पाहिजे. पण ते लिहणार नाहीत. कारण सरकार बनणार, टिकाणार आणि असेच पाच वर्ष जाणार हीच आपेक्षा संजय राउत यांची आहे आणि त्यासाठी ते जीवाचे रान करुन हाॅस्पीटलमध्ये  अॅडमीट होउनही लिहीत असतात. पण पत्रकार या नात्याने ते आम्हा तरुणांच्या प्रश्नावर काहीच लिहीत नाहीत आणि लिहणारही नाहीत.

    आज सरकारच्या याच भूमिकेचा निशेध म्हणून स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. खरे तर त्यांनी आत्महत्या केली नाही तर, तू एमपीएससी का करतो? असा प्रश्न विचारुन त्याला फासावर लटकवले आहे.  इथून पुढे सरकारकडे नोकरी मागणाऱ्यांची आवस्था स्वप्नीलसारखीच होणार आहे. कारण सरकार हे जनतेसाठी असते हे सरकारमधील लोकही विसरलेत आणि जनताही हे विसरुन गेली आहे. त्यामूळे सरकारी नोकरीचे प्रत्येक मैदान हे तरुणांसाठी स्मशान  बनत चालले आहे. 



    खरे तर लोकप्रतिनिधींनी तरुणांचे माय-बाप कसे होता येईल याचा विचार करावा. मागच्या अनेक दिवसापासून 12 आमदारांची यादी हरवल्याचे दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा  दोन वर्षपासून हरवलेली एमपीएससीची यादी शोधली असती तर आज स्वप्नीलने आत्महत्या केलीच नसती.

 खरे तर, फडणवीस सरकारने मागच्या ५ वर्षात नोकर भरती बंद करून तरुणांच्या आयुष्याचे १२ वाजवले म्हणून तरुणांनी नवीन सरकार निवडून दिले.  पण याही सरकारने वेगळे काही केल्याचे दिसत नाही. हेही १२ आमदारांच्या चर्चेच्या पुढे जाऊ शकले नाही. एखाद्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आभाळाकडे बघावे तसे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण अजूनही १२ मतीकडे डोळे आणि कान लावून बसलेले आहेत.  १२ आमदारांचा प्रश्न बाजूला ठेऊन तरुणांचे १२ कोणी वाजवले यावर ते  नक्कीच विचार करतील.  कारण ते जाणते राजे आहेत  यावरच सद्या तरुणाई चर्चा करत आहे.  


हेही वाचा 

फुले, शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन दुकानदारी 

 दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख

छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय?  

Thursday, July 1, 2021

फुले, शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन दुकानदारी

 


 फुले, शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन दुकानदारी 



    फुले, शाहू , आंबेडकरांचे  नाव घेवून  महाराष्ट्रात अनेक नेते आपली दुकानदारी चालवतात असा आरोप भाजप चे विधान परिशद सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. खरे तर या आरोपात किती तथ्य आहे याची जाणीव फुले,  शाहू , आंबेडकरांच्या अभ्यासकांना आहेच.


जवळपास सर्वच राजकीय पक्ष फुले,  शाहू , आंबेडकरांचे नाव घेतात परंतु त्यांच्या पावलावर चालत नाहीत. हे उघड वास्तव आहे. सर्वच नेते आम्ही यांचे कसे अनुयायी आहोत हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प
त्यांनी जो इथल्या शोषित , वंचित समूहाच्या उन्नतीचा मार्ग दिला त्याचा विचार कोणही करत नाही. 


म. फुलेंनी पहिल्यांदा गुलामगीरी, शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न अशा   अनेक लिखानातून बहुजन समाजाच्या व्यथा मांडल्या आणि त्यावर उपाय देखिल सुचविले. तर सामाजिक न्यायाचे जनक राजर्शी  शाहू  महाराज म्हणायचे, ‘शासनकर्ता जर आईबापासाखा असेल तर तो प्रजेपैकी दुबळया विभागाकडे खास लक्ष देतो आणि ता तसा नसेल तर ज्यांचे चांगले चालले आहे त्यांनाच अधिक देतो आणि जे दुबळे आहेत त्यांना आर्थिक दुर्बल करतो. पहिला समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावले टाकतो, तर दुसरा विशमता वाढवतो.’ पुढे जावून या दांघांच्याही विचारांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत स्थान दिले आणि आपला सामाजिक न्यायाचा दृष्टीकोण स्पश्ट केला. 


    परंतु आज या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेकडे आणि संविधानातील तरतुदीकडे जवळपास सर्वच सत्ताधाऱ्यांनी  दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच आरक्षणाचा अनुशेष भरला जात नाही, कोणत्याही कल्याणकारी योजना गरीबांपर्यंत पोहचत नाही, संविधानात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था असतानाही गरीबांना शिक्षण दिले जात नाही. गरीबांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी सर्वच महामंडळे कुलुपबंद आहेत. प्रत्येक योजनेला काही ना काही खोडा घालून सरकारच बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक न्यायाचा निधी दुसरीकडेच वळवला जात आहे. सामान्य जनांवरचे अन्याय अत्याचाराचे प्रमाण देखिल वाढले आहे. हे सर्व या नेतेमंडळींना माहीत नाही अशातला भाग नाही. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 


    अ
शा परिस्थितीतही हे नेते स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरांचे अनुयायी समजतात आणि आपण हे सर्व बघून, ऐकून, दुर्लक्ष करतोय. याच्यावर चळवळींनी विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला काय वटते? आणि काय करणे गरजेचे आहे? याचा विचारही होणे आपेक्षित आहे.  


नुकतेच काल तेलंगणा सरकारने अशा लोकांचा विचार करून त्याच्यासाठी नवी योजून आखली आहे. व त्यासाठी ४० हजार कोटींची तरतूदही केली आहे. [कालच्या ब्लॉग मध्ये मी त्यावर स्पष्ट लिहले आहे.] याचा विचार स्वतःला  पुरोगामी म्हणून घेणारे सरकार करनार आहे का? जर करत नसेल तर पडळ करांचा आरोप खरा समजावा लागेल. 



कालचा ब्लॉग

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख


   Note :  गोपीचंद पडळकरांनी जो आरोप केला आहे? यात आपल्याला काही तथ्य वाटत असेल तर नक्की विचार करा आणि काय केले पाहिजे यावरही विचार करा.


Wednesday, June 30, 2021

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख

 

 


दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख 


डाॅ. ह. नि. सोनकांबळे

 

 
    अटलबिहारी वाजपेयी यांनी सामाज कल्याण खात्याचे नाव बदलून सामाजिक न्याय असे केले आणि अनुसूचित जाती-जमातीच्या आर्थिक उन्नतीला ब्रेक लागला. तदनंतर कोणत्याही सरकारने या समूहाच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामूळे या समूहातील दारिद्रय रेशेेचे प्रमाण कमी होवू शकले नाही. केंद्रसरकारने तर नेहमीच हात झटकले. पण राज्य सरकारे देखिल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बजेट मांडत असताना आर्थिक तरतुद तर केली गेली. परंतु हे बजेट एक तर परत पाठवले जावू लागले किंवा दुसरीकडे वळवले जावू लागले. याचा अनुभव गेली अनेक वर्ष महाराष्ट्र  घेत आला आहे. 


    सध्याच्याही सरकारमध्ये असलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही यापेक्षा काही वेगळे केल्याचे दिसत नाही. परंतु या सर्व परंपरलेला तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर  राव यांनी बाजूला सारुन एक नवा आदर्श  निर्माण केला आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री दलित अधिकारीता कार्यक्रमांतर्गत’ दलित कुटंुबाच्या खात्यात थेट 10 लाख रुपयांच्या मतदीची घोषणा केली आहे. सुरुवातीला या योजनंअंतर्गत पहिल्या वर्षी 119 विधानसभा मतदारसंघातून 11,900 कुटंुबाची निवड केली जाणार आहे. या कुटंुबाच्या खात्यात थेट 10 लाख रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. 



    ही योजनेसाठी येणाऱ्या  चार वर्षात  40 हजार कोटींची तरतुद केली जाणार असून दरवर्षी 119 विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी 100 कुटंबाची निवड केली जाणार आहे. 


    सध्या सत्तेत असलेल्या  टीआरएस पार्टीचा असा दावा आहे की, या योजनमूळे येणाऱ्या  काळात दलितांचा आर्थिक विकास होईल व राज्यातील दारिद्रयाचे प्रमाण देखिल कमी होईल. 


    सध्या देषभरात रोजगाराचा मोठा प्रश्न  निर्माण झाला असून अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा  परिस्थितीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयाने हजारो कुटंबांना आधार दिला आहे. त्यामूळे चंद्रशेखर राव यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

 



    इतर राज्यांच्या सरकारने देखिल दारिद्रय निर्मुलनासाठी याचा विचार करणे आपेक्षीत आहे. कारण सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराज म्हणायचे, ‘शासनकर्ता जर आईबापासाखा असेल तर तो प्रजेपैकी दुबळया विभागाकडे खास लक्ष देतो आणि ता तसा नसेल तर ज्यांचे चांगले चालले आहे त्यांनाच अधिक देतो आणि जे दुबळे आहेत त्यांना आर्थिक दुर्बल करतो. पहिला समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावले टाकतो, तर दुसरा विषमता वाढवतो.’ टीआरएस चे सरकार हे शाहू महाराज म्हणतात त्या प्रमाणे तेथिल जनतेला ‘आई बापासारखे’ वाटत आहे. 

 

विनंती : 

आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.

 

Saturday, June 5, 2021

छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय?



छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय? 

डाॅ. ह. नि. सोनकांबळे


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाचा शेवटचा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहला तर हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुले यांना अर्पण केला आणि या देशातील बहुजनांना ऐक्याचे सुत्र दिले. पण हे सूत्र आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर आम्ही समजून घेणार आहोत का? 


हू अॅम आय? हा प्रश्न जेव्हा आम्ही स्वतःला विचारतो तेंव्हा अडीच हजार वर्षापुर्वीचा इतिहास आम्हाला आठवायला लागतो जो इतिहास डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शुद्र पुर्वी कोण होते? या प्रचंड संशोधन करुन लिहलेल्या ग्रंथाकडे घेवून जातो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना हे संशोधन करुण हा ग्रंथ लिहण्याची गरज का भासली असावी असा एक प्रश्न  आपल्यासमोर उभा राहतो. त्याचे उत्तर देखिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिले आहे. ते म्हणतात, जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत. याचा अर्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडून एका नव्या इतिहासाची आपेक्षा होती. परंतु आजूनही आम्ही आमचा इतिहास समजून घेतला नाही आणि जरी घेतला असेल तर  त्या इतिहासाचे मूळ घेऊन नवीन इतिहास घडवण्यासाठी आम्ही पेटून कधीच उठलो नाही. . 

खरे तर नवा इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला आपल्या पुर्वजांचा इतिहास माहित असणे आवश्यक असते. म्हणून शुद्र पुर्वी कोण होते या ग्रंथाच्या  माध्यमातून आमचा इतिहास आमच्या समोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला. परंतु त्याच्या पुढची अॅक्शन आम्ही आजूनही घेतली नाही. आपल्या नंतर अमेरिकेतल्या ब्लॅक लोकांना त्यांचा इतिहास माहित झाला आणि त्यांनी इतिहासाचे धडे घेवून नवीन इतिहासही घडवला. जी क्रांती डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘शुद्र पुर्वी कोण होते? या ग्रंथाच्या माध्यमातून भारतात अपेक्षीत होती. त्याच स्वरुपाची क्रांती अमेरिकेत ‘रुटस’ या ग्रंथाने झाली. कारण अमेरिकन लोकांनी जो दृष्टीकोण ठेवून ‘रुटस’ हा ग्रंथ वाचला ती दृष्टी घेवून ‘शुद्र पुर्वी कोण होते?’ हा ग्रंथ आम्ही भारतीयांनी वाचला नाही. 

अॅलेक्स हॅले या अमेरिकन संशोधकाने दक्षिण आफ्रिकेत जाऊन सतत तेरा वर्श संशोन केले आणि 1976 साली ‘रुटस्: द सागा आॅफ अॅन अमेरिकन फॅमिली’ नावाचे एक पुस्तक प्रकाशीत  केले. या पुस्तकात त्यांनी ब्लॅक लोकांचा म्हणजेच निग्रांेचा वास्तव इतिहास कुंटा किंटे या पात्राच्या रुपाने मांडला आणि त्यांच्यासोबत इतिहासात गोऱ्या  लोकांनी कसा व्यवहार केला याचे वास्तव आणि पुराव्यासह चित्र मांडले. ब्लॅक लोकांना गुलाम बनवून त्यांची कशा  प्रकारे विक्री केली जायची याचे वास्तव त्यांनी या पुस्तकात मांडले. एका देशातून दुसऱ्या  देशांत गुलाम घेऊन जात असताना ते सर्व गुलाम एका बोटीवर भरले जायचे. समुद्र मार्गे प्रवास करत असताना ज्या देशात हे गुलाम विकायचे आहेत त्या देशात पोहचायला महिना दोन महिने लागायचे आणि याच दरम्यान या गुलामांना मारहाण व्हायची, त्यांना खायला मिळायचे नाही, बोटीवर उपाशिपोटी काम करावे लागायचे अशा अनंत यातना सहन करत ते दुसऱ्या। देशात पोहचायचे आणि तिथे गेल्यावर यांच्या विक्रीचा प्रचंड मोठा व्यवहार व्हायचा. 

जर एका देशातून ही बोट दोनशे गुलाम घेवून निघाली तर दुसऱ्या  देशात केवळ शंभर ते एकशे  विस गुलाम पोहचायचे. कारण महिना दोन महिने प्रवास करत असताना कोणी आजारी पडून, कोणी उपाशी पोटी असल्याने, तर  कोणी काम करता करता असेच मरायचे. या आजारी पडलेल्यांना, मेलेल्यांना आणि कामासाठी योग्य नसलेल्या गुलामांना या बोटीतला व्यापारी जाता जाता समुद्रातच फेकुन द्यायचा म्हणून दोनशेपैकी केवळ शंभर ते एकशे विसच गुलाम तिथपर्यंत पोहचायचे. हा सर्व इतिहस अॅलेक्स हॅले यांनी शोधून काढला आणि 1976 साली ‘रुटस्ः द सागा आॅफ अॅन अमेरिकन फॅमिली’ या पुस्तक रुपाने प्रकाषित केला आणि अमेरिकन लोकांनी तो झपाटल्यासारखा वाचला. 

अॅलेक्स हॅले च्या हे लक्षात आले की, काही अशिक्षीत लोकांना हा इतिहास वाचता येत नाही. त्यांच्यासाठी त्याने या पुस्तकावर आधारीत आठ भागाची एक टिव्ही मालिका तयार केली आणि त्या माध्यमातून ब्लॅक लोकांना त्यांचा इतिहास माहित करुन देण्यात आला. असे म्हणतात की, जेव्हा ही मालीका टीव्ही वर दाखवली जायची तेव्हा अमेरिकेतल्या शहरातल्या रस्त्यावरची सत्तर टक्के वाहतूक कमी व्हायची. इतका जाणीवपूर्वक इतिहास तिथल्या लोकांनी जाणून घेतला. पुढे याच पुस्तकाने नवी क्रांती केली. आपला संपुर्ण इतिहास या लोकांना माहित झाल्याने हे लोक काळया आणि गोऱ्या या भेदभावाच्या वरोधात संघटीत व्हायला लागले. सतत्यांने पंचवीस वर्ष केवळ संघटन आणि संघटनच त्यांनी केले आणि पंचेविस वर्षानंतर त्यांनी अमेरिकेत क्रांती घडवून आणली  ‘बराक ओबामा’ नावाच्या एका ब्लॅक मानसाला त्यांनी अमेरिकेचे राश्ट्राध्यक्ष केले. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘शुद्र पुर्वी कोण होते?’ या पुस्तकाच्या माध्यमातून अशीच क्रांती आपेक्षित होती. परंतु आम्ही आजूनही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या  गभीरपणे समजून घेत नाही. ज्या प्रमाणात अॅलेक्स हॅले च्या पुस्तकाला अमेरिकेतील ब्लॅक लोकांनी समजून घेतले. त्यांच्याप्रमाणे आम्ही इतिहास वाचून त्यांच्याप्रमाणे अमपानाच्या विरोधात उभेच राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी दिलेली वर्तणुक, राजर्शी शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना दिलेली वर्तणुक आणि त्यांना फेकुण मारलेल्या शेणाचा अर्थ आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची या सर्व इतिहास संषोधनामागची भूमिका आणि त्यांना दिलेली वर्तणुक याचा अन्वयार्थ अजूनही आम्ही लावला नाही. 

खरे तर शुद्र पुर्वी कोण होते? या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या वारसदारांना एकत्र आणण्याचे सुत्र आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाचा शेवटचा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहला तर हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुले यांना अर्पण केला आणि या देशातील बहुजनांना ऐक्याचे सुत्र दिले. पण हे सूत्र आजच्या राजकीय पाश्र्वभूमीवर  आम्ही (मराठा-ओबीसी-एसी) समजून घेणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !


हेही वाचा

राजीव सातव : तांडवी राजकारणातला सायलेंट नेता


चीन सध्या काय करतोय?


ऍड. बाळासाहेब आंबेडकर : वंचितांचा मसिहा

Saturday, May 29, 2021

बाबासाहेबांच्या स्पर्शाने विहिरीचे सोने झाले



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला अन विहीरीचे सोने झाले. विहिरीची इतिहासात नोंद झाली. 


२९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावी दौरा होता. या गावातील अस्पृश्य मंडळींनी दोन दिवसीय अस्पृश्य परिषद येथे भरवली होती. अतिशय दुर्गम भागात असलेले हे गाव आजही येथे पोहचण्यास अडचणी येतात. 29 मे च्या उन्हाळ्यात बाबासाहेब या गावातील जि. प. च्या शाळेत दोन दिवस मुक्कामी होते. या गावातील विहीर बाबासाहेबांनी अस्पृश्यासाठी खुली करून दिली. आजही हि विहीर जशास तशी आहे. बाबासाहेबांचा स्पर्श झालेली ही विहीर आता स्मारक म्हणून इतिहासात नोंदवली गेली आहे. 



 बाबासाहेबांची  ही पातुर्डा भेट केवळ एक घटना नव्हती तर, चळवळीतील ऐतिहासिक नोंद होती. बाबासाहेबांच्या आगमनाने जिल्ह्यातील दलित चळवळीला उभारी मिळाली. या भेटीनंतर अनेक कार्यकर्त्यांंनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. 



या दोन दिवसीय अधिवेशनासाठी त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, . मकेसर ,  केशवराव खंडारे , संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. 



मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या सुरुवातीला एक ऐतिहासिक घटना देखील घडली. या गावातील  बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला होता. यामुळे आपले विवाह कसे असावेत हे बाबसाहेबांनीच सांगितले होते असे अनेक जुनी मंडळी सांगत असतात.



ज्या काळात बाबासाहेब या खेड्यात पोहचले त्या काळात गाड्यांची इतकी काही व्यवस्था नव्हती, रस्ते चांगले नव्हते. नद्या, नाले ओलांडून बाबासाहेबांनी हे गाव गाठले होते.



दरवर्षी शासनाच्या वतीने या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श सोहळा साजरा केला जातो. मलाही व्याख्यानांसाठी या गावातील मंडळींनी या ऐतिहासिक पर्वाला निमंत्रित केले होते. आमचे मित्र पत्रकार रवी इंगळे यांच्यामुळे मला हा सोहळा आणि बाबासाहेबांचा प्रवास अनुभवता आला. गावकरी मंडळी आणि सर्व मित्र परिवाराचे खूप खूप आभार. 


मित्रहो, कधी या भागात गेलात तर नक्कीच या ऐतिहासिक स्मारकाला भेट द्यायला विसरू नका. 

डॉ. ह. नि. सोनकांबळे


कृपया Blog ला Follow करायला विसरू नका. ही विनंती. 


जय भीम! 

हेही वाचा 

जपानच्या डॉक्टरांनी का मागितली राष्ट्राची माफी

मराठा आरक्षण : चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला

...हे मुख्यमंत्री लिहणार होते बाबसाहेबांचे चरित्र

Tuesday, May 25, 2021

विरोधकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता



विरोधकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता


डॉ. ह. नि. सोनकांबळे


म्हणतात ना ‘स्वदेश पुज्यते राजा, विव्दान सर्वत्र पूज्यते’ अभ्यासू माणसांला जगात कुठेही किंमत असते. असेच काही विलासरावांचे होते. विलासराव देशमुख आणि इतर नेत्यांत एक फरक एवढाच होता की, ते अभ्यासपूर्ण उत्तरे द्यायचे. याचा अर्थ असा नाही की, ते सतत अभ्यासच करत बसायचे. त्यांनाही अभ्यासाला जास्त वेळ मिळायचा नाही. परंतु ते मिळेल तेवढा वेळ अभ्यासू माणसांत घलवत असत. अभ्यासू व्यक्तींना भेटणे, विविध विषयावर चर्चा करणे, नवीन पुस्तकांवर लक्ष ठेवुन राहणे. यात त्यांना वेगळी रुची होती. म्हणूनच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सभागृहात ते कुठे तरी कमी पडले? त्यांचा कुठेतरी आपमाण झाला? कोणाच्या तरी प्रश्नाला उत्तर देता आले नाही, फजीती झाली. असे कधीच घडले नाही. उलट प्रसंग कोणताही असो सभागृह जिंकूणच ते बाहेर पडायचे. 

कुठे काय बोलावे, कसे चिमटे घ्यावे, कशा फिरक्या घ्याव्यात यात त्यांचा हातकंडा होता. म्हणूनच ते सभागृहात असले की, सभागृहात हास्यकल्लोळ असायचा. त्यांच्या कार्यकाळात गोपीनाथराव मुंडे आणि नारायण राणे असे पटटीचे विरोधी पक्ष नेते त्यांना लाभले. परंतु विरोध कितीही टोकाचा झाला तरी आपमाण कोणाचाही होणार नाही. याची ते सातत्याने काळजी घेत असत. नारायण राणे यांचा स्वभाव फटकळ असल्याची जाणीव त्यांना होती. परंतु त्यांनाही मिश्किलपणे चिमटे काढत शांत करणारी शैली विलासारावांकडे होती. सभागृहात एकमेकांच्या विरोधात कितीही बालले तरी शेवटी घरुन आणलेला डब्बा एकत्र बसून खाणारे हे नेते होते. सभागृहात लोकशाहीचा धर्म आणि सभागृहाबाहेर मैत्रीचा धर्म विलासारावांनी कधीच सोडला नाही. नारायण राणे विरोधी पक्ष नेते असल्याने विलासारावांचा ते कडवा विरोध करायचे, सभागृह तहकूब करायचे. याचा राग विलासारावांना कधीच आला नाही. कारण त्यांना लोकशाहीचा धर्म माहित होता. विरोधकांचे काम विरोध करणे असते, त्यांनी जर विरोध केला नाही तर लोकशाही टिकणार नाही. याची जाणीव त्यांना होती. त्यांच्यात अनेक वेळा खडाजंगी व्हायची. सभागृहाचे कामकाज थांबवावे लागायचे. परंतु दुपारच्या जेवणाच्या वेळी हे दोघे एकमेकांना फोन करायचे आणि घरुन डब्बा आला आहे चला जेवण करु म्हणायचे आणि एकाच डब्यात जेवून पुन्हा सभागृहात भांडायला तयार व्हायचे. 

लोक याला तडजोडीचे राजकारण असे जरी म्हणत असले तरी एका अर्थाने याला लोकशाही म्हणावे लागते. कारण विरोधक कोणीही असो तो सरकारच्या चुका दाखवून देणारा असावा लागतो. इंग्लंड सारख्या देशात जेव्हा लोकशाहीचा पाया घतला गेला तेव्हा विरोधकाला पगार देवून टीका करायला लावली जायची. याचे कारणच असे होते की, सरकार कुठे चुकते आहे हे दाखवून देण्याचे काम त्याने योग्य पद्धतीने केले पाहीजे. तीच प्रथा विलासारावांनी महाराष्ट्रात जिवंत ठेवली. विरोधक कसा असावा याचाही त्यांचा चांगलाच अभ्यास होता. म्हणूनच त्यांना गोपीनाथराव मुंडे विरोधक म्हणून रहावेत असे वाटायचे. कारण त्यात दुहेरी भूमिका होती. एक तर सभागृहात ते आपल्या चुका सांगतच असतात परंतु सभागृहाच्या बाहेरही मित्र म्हणून ते मित्रत्वाचे सल्ले द्यायचे. कधी कधी मिश्किलपणे बोलताना महाराष्ट्राला अशाच विरोधी पक्षनेत्याची गरज आहे असे बोलून दाखवायचे. एक प्रसंग तर सभागृहातच घडला होता. गोपीनाथराव मंुडे विरोधी पक्ष नेते असताना ते सभागृहात आमचे सरकार आले आणि मी जर मुख्यमंत्री झालो तर कसे काम करेण हे सांगत होते. त्यावर विलासारव त्यांना उत्तर देताना म्हणाले की, ‘गोपीनाथरावांनी मुख्यमंत्री होण्याच्या भानगडीत पडू नये. कारण ते विरोधी पक्ष नेते म्हणूनच शोभून दिसतात. अशाच विरोधी पक्ष नेत्याची सध्या महाराष्ट्राला गरज आहे.’ विलासारावांचा हाच स्वभाव सभागृहातील नेत्यांना काम करण्यासाठी उत्साह देवून जायचा. 

त्यांच्या या स्वाभावानेच विरोधकांच्या मनावर देखी अधिराज्य गाजवले. माजी केंद्रिय मंत्री राजीव शुक्ला यांनी असाच एक प्रसंग विलासारावांच्या बाबतीतला सांगीतला होता. प्रसंग दिल्लीतला होता. जेव्हा मनमोहनसिंग पंतप्रधान होते. तेव्हा अण्णा हाजारे यांनी दिल्लीत लोकपालच्या अनुषंगाने मोठे आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला धरुन संसदेत विरोधकांची आणि सरकारची प्रचंड खडाजंगी होत होती. विरोधक संसदेचे कामकाज तहकुब करत होते, सरकार पाडण्याची भाषा करत होते. काॅंग्रेसचे अनेक नेते अण्णा हजारे यांना आंदोलन मागे घेण्याचे प्रस्ताव देत होते. पण अण्णा हजारे काही आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते. तेव्हा विलासाराव नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडून केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. विलासारावच हे आंदोलन शांत करु शकतात अशी काॅंग्रेसच्या गटात एक चर्चा होती. त्यांची भेट मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी यांच्यासोबत झाली आणि दुसऱ्याच दिवशी विलासाराव अण्णा हजारे यांच्या भेटीला रामलिला मैदानावर गेले. त्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि आंदोलन शांत केले. या आंदोलनाचे स्वरुप इतके भयंकर होते की, जागतीक स्तरावरच्या प्रसारमाध्यमांनी देखील याची दखल घेतली होती. हे आंदोलन कदाचित विलासराव नसते तर अनेक दिवस पुढे चालू राहिले असते. परंतु विलासरावांचा स्वभाव हा विरोधकांनाही शात करणारा होता. त्यामूळे अण्णा हजारे यांना देखील त्यांची भेट भावली असावी. त्यामूळेच हे आंदोलन संपुष्टात आले. राजीव शुक्ला त्यांची आठवण सांगताना म्हणतात की, ‘हे आंदोलन विलासारावांनीच शंात केले, ते नसते तर आंदोलन आणखी जास्त चिघळले असते.’ परंतु त्यांच्यात असलेल्या बंधुभावाने तसे होवू दिले नाही. 

बंधुता हे लोकशाहीचे प्रमुख मूल्य आहे. त्यामूळे लोकशाहीत कोणीच कोणाचा शत्रू नसतो. तो फक्त विरोधक असतो. परंतु ही बंधुता आता महाराष्ट्राच्याही राजकारणातून हददपार होत चालली आहे. सद्याच्या राजकारणात विरोधक नाही तर केवळ शत्रू समजून राजकारण केले जावू लागले आहे. ‘आमची सत्ता आली की तुमचा कार्यक्रमच लावू’ अशी भाषा सातत्याने ऐकण्यात येत आहे. सत्ता हे विकासाचं साधन असतं ते साध्य नाही. हे म. गांधी यांचे तत्व आणि सत्ता हे जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्यूशन असतं हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व विलासारावांना चांगलेच माहित होते. म्हणूनच त्यांनी सत्तेचा उपयोग विरोधकांना संपवण्यासाठी नाही तर विरोधकांना सोबत घेवून ‘विकासाचं राजकारण’ करण्यासाठी केला. ते विरोधकांचे सल्लेही काळजीपूर्वक ऐकत असत आणि चांगल्या गोष्टींची अमलबजावणी करण्यासाठी त्यांची मतदही घेत असत. 

खरे तर नाटकातले पात्र, पुस्तकातले चित्र आणि राजकारणी मित्र हे कधीच खरे मानायचे नसतात. पण काही मानसे अशी असतात की, ते अशा परंपरांना देखील बाजूला सारुन नवा इतिहास निर्माण करतात. विलासाराव देशमुखांनी तो इतिहास निर्माण केला. आजकाल स्वपक्षातील लोकांशीही मैत्री होत नसताना त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी मैत्री निर्माण केली आणि ती शेवटपर्यंत जपली. मैत्रीत राजकारण करायचं नाही परंतु राजकीय मैत्री करत राहायचं. हेच त्यांचं तत्व होतं. त्यामूळेच ते विरोधकांच्या मनावर देखिल कायमच अधिराज्य गाजवत राहिले.


(पॉलिटिकल आयडॉल या आगामी पुस्तकातून)


ब्लॉग ला Follow आणि Share करायला विसरू नका. 

Thursday, May 20, 2021

जपानच्या डाॅक्टरांनी का मागितली राष्ट्राची माफी?




जपानच्या डाॅक्टरांनी का मागितली राष्ट्राची माफी? 

डॉ. ह. नि. सोनकांबळे 

कोणत्याही खुर्चीला जेवढे अधिकार असतात तेवढेच कर्तव्य देखिल चिकटलेले असतात. परंतु भारत हा अशा देशांच्या यादीत येतो जिथे लोक आपल्या ‘.... तो आमचा अधिकार आहे’ अशी भाषा वापरुन अधिकाराचा पूरेपूर वापर करतात अन कर्तव्यवापसून मात्र पळ काढतात. पण असे करणे म्हणजे दुसऱ्य्याच्या अधिकाराचे हनन करणे असते हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. पण जपान हा एकमेव देश असा आहे जिथे लोक अधिकाराची भाषा कमी आणि कर्तव्याची भाषा जास्त वापरतात. त्यांना हे माहित आहे की, एखाद्या व्यक्तीला चांगल्या अरोग्याच्या सुविधा मिळाव्यात हा त्या व्यक्तीचा अधिकार असतो तर त्या व्यक्तीला चांगल्या अरोग्याच्या सुविधा देणे हे डाॅक्टरचे कर्तव्य असते. 


भारतात मात्र डाॅक्टरने आरोग्याच्या सुविधा कशाही दिल्या तरी चालेल मात्र हाॅस्पिटलची फिस मत्र भरावीच लागेल अशा सक्तीने आरोग्य सेवा पूरवली जाते. इथे एखाद्याचे प्राण गेले काय किंवा एकखाद्याला चूकिची ट्रीटमेंट मिळाली काय? याच्याशी डाॅक्टरांना काहीएक देणेघेणे नसते. किंवा असे एकही प्रकरण या देशात घडले नाही जिथे डाॅक्टरने कबुली दिली असेल की, ‘आमच्याकडून चुकिची ट्रीटमेंट झाली म्हणून तुमच्या पेशंटचे प्राण गेले’ पण असे जपान मध्ये अनेक वेळेस घडले आहे. 


नुकतेच जपानच्या इकोमा शहर रुग्णालयात 85 जणांना डाॅक्टरांनी चुकीने करोना लसीऐवजी ग्लुकोजचे इंजेक्शन दिले. ही चुक डाॅक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आमाच्याकडून चुक झाली अशी कबुली दिली. एवढेच नाही तर या सर्व डाॅक्टरांनी राष्ट्राची माफी मागितली. यात रुग्णालयाचे प्रमुख कियाशी अॅंडोही यांचा देखिल समावेश आहे. 


माफी मागत असाताना तेथिल डाॅक्टरांनी असे कबुल केले की, ‘आमची चुक ही माफ करण्यासारखी नाही. कारण आम्ही जनतेच्या आरोग्याशी खेळलो आहोत. इतकेच नव्हे तर आमच्याकडून त्यांची फसवणूक देखिल झाली आहे. 


भरतात दररोज अशा किती तरी केसेस होत असतील मात्र अद्याप एकाही डाॅक्टरने माफी मागितल्याचे ऐकिवात नाही.


सूचना : ब्लॉगवरील कोणत्याही पोस्ट परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करू नये. 


हेही वाचा

भ्रष्टचाराला सरकारी पाठबळ मिळवायचे असेल तर


तांडवी राजकारणातला सायलेंट नेता


चीन सद्या काय करतोय?

Tuesday, May 18, 2021

बिनधास्त लाच घ्या; आता निलंबन नाही?



बिनधास्त लाच घ्या; आता निलंबन नाही?

डॉ. ह. नि. सोनकांबळे


सरकारी अधिकाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे. आता लाच स्वीकारताना तुम्हाला जरी "रंगेहाथ" पकडले तरीही तुम्हाला कोणीही निलंबित करू शकणार नाही. महाविकास आघाडी सरकारने हा नवा अलिखित नियम तयार करून लाच घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांना या सरकारने अच्छे दिन आणले आहेत. आपल्याला जर लाचलुचपत विभागाने पकडले तर अवघ्या 48 तासाच्या आत तुम्ही पुन्हा आपल्या कामावर रुजू होऊ शकता आणि बिनधास्त भ्रष्टाचारही करू शकता. ही ऑफर 2020 पासूनच लागू झाली आहे. कालच एक आरटीओ आधिकऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्याला अटक होऊ नये, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा कमला लागली. 15 तासानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला तर 48 तासाच्या आत तो पुन्हा कामावरही रुजू झाला. शिवाय 2020 मध्ये अडीचशेहून अधिक अधिकाऱ्यावर तर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तुम्हीही बिनधास्त राहा आणि महाविकास आघाडी सरकारच्या या ऑफर चा फायदा घ्या. 


सविस्तर माहितीसाठी आजच्या दिव्या मराठीची ही बातमी वाचा. 



हे वाचून तुम्हाला अश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. खुद एसीबी नेच हे सांगितले आहे की, आम्ही जरी सापळा रचून एखाद्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडत असलो तरी त्यांच्यावर पुढे कोणतीही कार्यवाही होत नाही. मागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये जवळपास 238 अधिकाऱ्यांना मोठया रकमेची लाच घेताना एसीबी ने (रंगेहात) पकडले होते परंतु त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही किंवा त्यांचे निलंबनही झाले नाही. उलट यातल्या अनेक अधिका$यांना बढती देखिल मिळाली आहे. तर चालू वर्षात म्हणजे 2021 मध्ये वर्ग एकच्या 19, वर्ग दोन च्या 17, वर्ग तीन च्या 99, वर्ग चार च्या 6, व इतर 63 अशा एकूण 204 अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना (रंगेहात) पकडले होते परंतु त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ही आकडेवारी परिक्षेत्रनिहाय अशी आहे. मुंबई 17, ठाणे 27, पुणे 12, नाशिक 2, नागपूर 55, अमरावती 26, औरंगाबाद 19 तर नांदेड 46 अशी आहे. 


तुम्ही म्हणत असाल कोरोनामुळे यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसेल. परंतु कोरोना भारतात येण्यापूर्वी देखिल असेच होत आले आहे. अशा लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर बहुतांष वेळा कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे सर्व अधिकारी वरिष्ठांच्या, मंत्रयाच्या व नेत्यांच्या संपर्कातले किंवा त्यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचे समाजते. काही जण पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाप्ते देखिल देतात, शिवाय यातले अनेक अधिकारी पक्षाला फंडिंग देखिल करत असतात. त्यामूळे त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. 


परंतु जे लाचखोर अधिकारी व कार्मचारी उपरोक्त नियमानुसार लाच घेत नाहीत त्यांच्यावर मात्र थेट निलंबनाची कार्यवाही करण्यात येते. त्यामूळे अशा लोकांना मात्र धोका आहे. 


या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हावी हा उद्देश या ब्लाॅगचा अजीबात नाही. तर आपल्यावर निलंबनाची किंवा इतर कोणतीही कार्यवाही होवू नये असे वाटत असेल तर सरकारी नियमानुसार म्हणजेच वरिष्ठांना, पालकमंत्रयांना, नेत्यांना हप्ते देवून किंवा विविध पक्षाला पार्टी फंड देवून भ्रष्टाचार करावा हे सांगण्यासाठी आहे. ज्या अधिका$यांना एसीबी ने पकडूनही त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली नाही असे अधिकारी जर आपल्या आजूबाजूला राहत असतील किंवा आपण त्यांना ओळखत असाल तर त्यांचे मार्गदर्शन सातत्याने घेत रहा. 


घरी रहा, सुरक्षीत रहा, काळजी घ्या आणि बिनधास्त भ्रष्टाचार करा. सरकार आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे.

 

दुनिया की कोईभी ACB तुम्हारा कुछ नहीं बिघाड सकती!

हेही वाचा


तांडवी राजकारणातला सायलेंट नेता

मराठा आरक्षण: चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला


चीन सध्या काय करतोय?



Sunday, May 16, 2021

तांडवी राजकारणातला सायलेंट नेता



तांडवी राजकारणातला सायलेंट नेता 

डॉ. ह. नि. सोनकांबळे 


कुठलेतरी वादग्रस्त व्टिट करुन, भंपक डायलाूगबाजी करुन, जाती-जाती आणि धर्मा-धर्मा मध्ये तेढ निर्माण करुन राजकरणात यशस्वी होवू पाहणाऱ्यांनी राजीव सातव या व्यक्तमत्वाचा अभ्यास केला पाहिजे. शातता राखून, संयममाने, अभ्यासपूर्वक राजकारणात कसं यायचे आणि जाती-जातील आणि धर्मा-धर्मातील कोणत्याही वादाला थारा न देता सर्व समावेशक राजकारण करुन लोकांच्या हृदयात कसं घर करता येतं याचं उदाहरण ठरलेल्या राजीव सातव यांनी केवळ जनतेच्याच नाही तर, एका वर्षातच सोनिया गांधी, राहूल गांधी आणि केंद्रतील अनेकांच्या हृदयात घर केलं होतं. आजच्या नव्याने राजकारणात येणाऱ्यातरुणांना हे जमेल का? 


काही दिवसापूर्वी माझे विद्यार्थी अमित कुटे दिल्लीला गेले होते. मी त्यांना सहज फोन केला आणि दिल्लीत कुठे थांबलात असं विचारलं. त्यावर अमित म्हणाला सर राजीव भाउ कडे थांबलोय आणि हो आज त्यांनी आम्हाला संपूर्ण संसद स्वतः फिरुन दाखवली. अनेक नेत्यांच्या ओळखी करुन दिल्या. सर तुम्ही एकदा भाउ ला भेटा आणि लोकशाहीतला शांत, संयमी आणि अभ्यासू नेता कसा असावा हे अनुभवा. अमित त्यांच्याबददल जे काही सांगत होता त्यावरुन माझा त्यांच्याबददलचा अभ्यास आणि आकर्षण वाढत होतं. मी अमितला म्हणालो, एकदा हा कोरोणाचा काळ संपला की आपण नक्कीच त्यांची भेट घेउ. परंतु कोरोनाने या भेटीची आस कायमची संपुष्टात आली. 

अवघ्या कमी वयात आणि कमी कालावधीत दिल्लीच्या राजकारणात आणि सोनीया गांधी आणि राहूल गांधी यांच्या काळजात घर केलेला हा नेता तसा प्रसिद्धीपासून कोसो दूर राहण्यातच धन्यता मानायचा. कुठलीही प्रसिद्धी, भंपकबाजी, टिंगल टवाळी किंवा कोणवरतरी चिखलफेक न करता देखिल राजकारणात यशस्वी होता येवू शकते याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजीव सातव. आजच्या तांडवी राजकारणात प्रत्येक नेता तोल सोडून बोलत असताना आणि खालच्या पातळीवर जावून एकमेकावर टीका करत असताना राजीव सातव यांनी कधीच आपला तोल जावू दिला नाही. 

मागच्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत अनेक नेते गुजरात मध्ये जावून खालच्या पातळीवर टिका करत होते. या निवडण्ूाकीत राजीव सातव यांनी पक्षाची प्रभारी पदाची धुरा सांभाळली होती. केंद्रातले अनेक नेते येवून एकमेकांवर चिखलफेक करुन जात होते मात्र अशा नेत्यांना कसल्याही प्रकारची भिक न घालता किंवा त्यांना खालच्या पातळीवरुन प्रतिउत्तर न देता सातत्याने कामात व्यस्त राहून काॅंग्रेसला विजयाच्या दिशेने खेचून नेले. खरे तर देशाच्या पंतप्रधानाचे हे राज्य होते. तिथे काॅंग्रेस टिकणारच नाही असे सर्वांनाचा वाटत होते. अशा परिस्थितीत राजीव सातव यांनी आपले पाॅलीटीकल मॅनेजमेंट केले आणि 77 जागां निवडूण आणत सत्ताधा$यांना चांगलाच घाम फोडला. खरे तर या विजयाचे पूर्ण श्रेय राजीव सातव यांनाच द्यावं लागतं. कारण नरेंद्र मोदी यांच्या झंझावादामूळे हाताश झालेल्या काॅंग्रेसला त्यांच्याच राज्यात पुन्हा एकदा उर्जा मिळवून देण्याचे काम राजीव सातव यांनी केले आणि काॅंग्रेस पुन्हा एकदा नव्या उमेदिनी कामाला सुद्धा लागली. 

पक्ष जो जबाबदारी देईल ती अगदी शांतपणे पार पाडण्याची तयारी असलेला हा नेता. हिंगोली जिल्हयातून ते 2009 मध्ये जातीपातीच्या राजकारणाचे सर्व बंध तोडून हा चेहरा राज्याच्या विधानसभेत पोहचला. त्यांच्यातली युवा उर्जा ओळखून काॅंग्रेस ने त्यांना 2010 म/ये युकव काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले. याच संधीचे सोने करत त्यांनी 2014 च्या निवडणूकीत विजय मिळवून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. 2014 म/ये असलेल्या मोदींच्या लाटेत देखिल त्यांनी विजय खेचून आणला आणि पुन्हा एकदा हा चेहरा दिल्लीत चर्चेचा विषय ठरला. 2019 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ पक्ष बांधणीसाठी निवडणूक न लढवता पक्ष बांधणीसाठी काम करण्याचे ठरवले परंतु काॅग्रेस ने त्यांना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठविले. 

आज देशाच्या राजकारणात अशा तरुणांची गरज असतानाच त्यांची एक्झीट हा चर्चेचा नाही तर चिंतेंचा विषय आहे. खरे तर आजच्या तांडवी राजकारणात अशा शांत संयमी, अभ्यासू अर्थात सायलेंट नेत्याची खरे तर देशाला गरज आहे. त्यांना अजपर्यंत 4 वेळेस संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची संसदेतली उपस्थितीत देखिल 81 टक्के इतकी होती. त्यांनी संसदेत विक्रमी 1075 प्रश्न विचारले होते. काही महिन्यापूर्वी शेतकरी कायद्याला विरोध करत असताना त्यांना निलंबीत केले गेले. याचा निषेध करत त्यांनी एक रात्र संसदेच्या बाहेरील लाॅन वर निशेध आंदोलन केले आणि तेथील लाॅन वर झोपून काढले. कसल्याही प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय करणारे विधेयक मंजूर होता कामा नये. याच भूमिकेत ते शेवटपर्यंत राहिले. त्यांची ही लढाई अपूर्णच राहीली. 

राजकारणात नव्याने येणार तरुण वर्ग त्यांना कदापिही विसरणार नाही. कारण त्यांच्यासाठी राजीव सातव म्हणजे एक सक्सेस स्टोरी तर आहेच शिवाय नेता कसा असावा याचा आदर्शही आहे. 

अशा या शांत संयमी, अभ्यासू सायलेंट नेत्याला विनम्र अभिवादन!


हेही वाचा 

विलासराव देशमुख : विरोधकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता


चीन सध्या काय करतोय


जपानच्या डॉक्टरांनी का मागितली राष्ट्राची माफी?

Sunday, May 9, 2021

मराठा आरक्षण: चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला





मराठा आरक्षण: चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला

डॉ. ह. नि. सोनकांबळे 


मराठा समाजातल्या विचारवंतांनी पुढे यावे आणि दोष कोणाचा आहे यावर प्रबोधन करावे. तरच संविधान विरोधकांचे मनसुबे उधळले जातील. 


भविष्यात राज्यकरर्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करुन लोक संविधानालाच दोष देत बसतील आणि चांगल्या संविधानाला देखिल लोक वाईट आहे असे म्हणतील. नेते मात्र निर्दोष आणि मोकाट फिरतील. असे होणार आहे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आगोदरच माहित होते. म्हणूनच त्यांनी संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात असा इशारा दिला होता की, 


आज देशभरात हेच दिसून येत आहे. लोक संविधान वाईट आहे असेच म्हणू लागले आहेत आणि चुका करणाऱ्या आपल्या नेत्याला मात्र निर्दोष सोडून देत आहेत. नुकतेच मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रयांचा पाउस पडू लागला आहे. यात अनेकांनी राज्यकत्र्यांना दोषींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे परंतु त्यांचा आवाज कमी पडतो आहे. 

मात्र दुसरीकडे संविधानाला दोषींच्या पिंजऱ्या उभे करणाऱ्यांचा आवाज मात्र दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. सर्व दोष संविधानाचा आहे. आम्हाला जर हे संविधान आरक्षण देवू शकत नसेल तर आम्ही संविधानच बदलू, आमचा संविधानावरचा विश्वास उडत चालला आहे. असेच बोलले जात आहे. मात्र आपण हे का तपासून पाहत नाही की, आपण ज्यांना आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण दिले आहे, त्यांच्या चुकांमूळे आज आपल्यावर अशी वेळ आली आहे. 

एक साधं गणीत असं आहे की, जर संविधान 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देवू शकत नसेल आणि एखाद्या सरकारने दिले तर ते टिकणार नाही. असे असताना 



याचं सरळ गणीत हे आहे की, त्या राज्यकत्र्यांनी ते टिकवून ठेवलं. आज महाराष्ट्रात आजपर्यंत 19 पैकी 13 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होवून गेले शिवाय सध्या राज्यात जवळपास 169 आमदार तर 24 खासदार हे मराठा आहेत.  असे असताना देखिल हे आरक्षण टिकू शकले नाही. 

कारण मराठा आरक्षणाची मागणी, पाठपुरावा आणि लढाई योग्य मार्गाने झाली नाही. मूळात जर राज्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत जर एकाच जातीचे एवढे लोकप्रतिनिधी असताना लाखोंच्या संख्येने मोर्चे काढावे लागले. यामूळे हेच सिद्ध होते की, हे निवडलेले लोकप्रतिनिधी निवडताना मराठा समाजाकडून काही तरी चूक झाली आहे. कारण यातले कोणीही मराठा समाजाच्या हाकेला ‘ओ’ देणारे नाहीत. किंवा ते केवळ प्रतिष्ठेसाठी, स्वसंपत्तीच्या संरक्षणासाठी आणि शासनाच्या पैशावर मजा करण्यासाठी निवडूण आलेले आहेत. त्यांचे आपल्या काय, कोणत्याच समाजाशी काही देणे घेणे नाही.

जर काही देणे असते तर 24 पैकी एखाद्या खासदाराने लोकसभेत मराठा आरक्षण विधेयक मांडले असते. व  जसे आर्थिक निकषांवर 10 टक्के आरक्षण तसेच मराठा समाजाचाही विचार करावा असे म्हटले असते. परंतु असे 24 पैकी एकाही खासदाराने म्हटले नाही. किंवा राज्याच्या विधानसभेतील 169 पैकी एकाही आमदाराने किंवा मंत्र्याने याचा निषेध म्हणून आजपर्यंत राजिनामाही दिला नाही. यातून हे स्पष्ट होते की, यांना कोणालाही मराठा आरक्षणाविषयी काही देणे घेणे नाही. 

कारण त्यांना हा वर्ग सहज मिळाला आहे. जो संविधान बदलण्याची भाषा करतो आहे. याची जाणीव अनेक मराठा अभ्यासकांच्या गटाला झाली, परंतु ते देखिल या मोठया गटाला समजावून सांगण्यात कमी पडत आहेत. कारण जवळपास सर्वच मराठा लोकप्रतिनिधी हे त्यांच्या विरोधी मताचे आहेत. 

यातून खरा पिळला जातो आहे तो आरक्षणाची खरी गरज असलेला मराठा समाज. जो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसला होता. परंतु त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे की, नेमकं आपल्याला साथ कोणी दिली नाही. संविधानाने की लोकप्रतिनिधींनी? याचे उत्तर शोधून याचा विचार केला पाहिजे की? ज्याने आपल्याला साथ दिली नाही त्यांना आगोदर बदलावे लागेल. परंतु इथेही लोकप्रतिनिधींचाच विजय होईल आणि ते लोकांना हे पटवून देतील की, संविधानाने अडचणी निर्माण केल्या आहेत. चला ते आगोदर बदलू. 

लोक देखिल त्यांचे पुन्हा ऐकतील आणि लोकप्रतिनिधींऐवजी संविधान बदलण्याच्या लढाईत सामिल होतील. असे करण्यापूर्वी त्यांना जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करावा आणि ठरवावं की, खरोखर कोणतंही संविधान वाईट असतं की, त्याला राबविणारे लोक वाईट असतात. अमेरीकेत केवळ 50 पानांचे संविधान आहे, इंग्लंड मध्ये तर लिखित संविधानच नाही. पण या दोन्ही राष्ट्रांचा कारभार व्यवस्थित चालतो कारण त्याला राबविणारे लोक अर्थात निवडूण दिलेले लोकप्रतिनिधी चांगले आहेत. म्हणून त्यांना संविधान चांगले की, वाईट यावर चर्चा करायला वेळच नसतो. त्यांना माहित आहे, जर लोकप्रतिनिधी चांगले असतील तर संविधान कसेही असले तरी काही हरकत नाही. कारभार चांगलाच होत असतो. आपण असा विचार कधीच करत नाही. आपल्या जातीचा नेता आपल्याला नेहमी चांगलाच वाटत असतो. त्याने आपले कितीही वाटोळे केले तरीही आपल्याला काहीच वाटत नाही. परंतु दुस$या जातीचा चांगला माणूच लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण द्यायचा नाही. ते म्हणतात ना, ‘नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.’ 

म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे, 



आणि मगच कोणत्या लाढाईत सामिल व्हायचे ठरवले पाहिजे. अन्यथा अपणच आपल्या हातून आपला सर्वनाश ओढवून घेणार आहोत हे मात्र नक्की!