Friday, June 23, 2023

बबल्या ईकस केसावर फुगे

  



                     बबल्या 

                            ईकस केसावर फुगे

              


 पर्यावरणाच्या दृष्टीकोणातुन टाकाऊ पदार्थाची पुनर्निमिती आणि पुनर्वापार म्हणूनही अनेक देश केसांच्या व्यवसायाकडे बघत आहेत. 2022 या आर्थिक वर्षात भारतातुन 770.70 दशलक्ष युएस डॉलर किंमतीच्या केसांची निर्यात केली गेली असून भारत हा केसांची निर्यात करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे.      

Advt.

 
भारत हा केसांवर प्रेम करणा­या लोकांचा देश आहे. ये रेशमी जुल्फें पासून ते बाला- बाला पर्यंत अनेक गाणी आणि कथा भारतीयांनी लिहल्याचे ज्ञात आहे. डोक्यावर केस असणे म्हणजे सौंदर्याचं प्रतिक जरी मानलं जात असलं तरी, टक्कल पडणं म्हणजे विद्वान असल्याची ओळख असंण असंही म्हटलं जातं. केसांवर अनेक अभ्यासकांनी आपापली मते मांडून ठेवली आहेत. ना. सी. फडके यांचा काळे केस हा धडा तर चक्क आपल्या अभ्यासक्रमातच आहे तर वामान दादा कर्डक यांनी आपल्या एका कवितेतजेव्हा केस हे माझे गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागलेअसे म्हटले आहे

 

आजही केसांवर लिहणारे आणि आवडीने वाचणारे आणि ऐकणारे काही कमी नाहीत. काही दिवसांपूर्वीच खानदेशातल्या अहिराणी भाषेतलं मनी माय बबल्या ईकस केसावर फुगेहे गाणं युट्युब ला धुमाकुळ घालून गेलं. खरं तर बबल्या हा केसांचा व्यवसाय करणा­यांचा एक प्रतिनिधी आहे. आपल्याला जरी हा व्यवसाय छोटा वाटत असला तरी भारत हा केसांचा व्यवसाय करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे


 

हे वाचून आपल्याला अश्चर्य वाटत असेल. कारण आपल्या गावाकडे तर केसावर फुगे, पिना, बंम्बई मिठाई अशा अनेक वस्तु आपण सहज विकत घेतो. आता तर केसांवर चक्क घरगुती भांडी आणि बकेट सारख्या वस्तुही मिळत आहेत. परंतु हे सर्व आपण आजवर पाहत आलोय किंवा केसांच्या या अर्थव्यवस्थेचा भागही होत आलो आहे. पण याच्या मुळाशी कधी आपण जाऊन पाहत नाही. आपण मुठभर केस देऊन एखादी वस्तु घेतो पण या केसांचे पुढे काय होते? पण अर्श्चर्याची बाब म्हणजे आपले केस बाजाराज चार हजार  ते पंचवीस हजार किलोने विकले जातात

 

याचे महत्वाचे कारण म्हणजे भारतीय लोकांच्या केसांवर परदेशी पाहुणे देखील फिदा असतात. म्हणुनच की काय, भारताच्या केसांना जगभरातुन मागणी असते. याचाच एक भाग म्हणून 2022 या आर्थिक वर्षात भारतातुन 770.70 दशलक्ष युएस डॉलर किंमतीच्या केसांची निर्यात केली गेली आहे. 

 


भारतातुन निर्यातीसाठी दोन प्रकारचे केस जमा केले जातात. एक रेमी केस आणि दुसरे नॉन रेमी केस. रेमी केस हे सर्वोत्तम आणि चांगल्या दर्जाचे केस असतात ज्याला बाजारात चांगला भाव मिळतो तर नॉन रेमी केस हे केसावर पिना, फुगे अशा वस्तु विकुन जमा केले जातात किंवा त्याला कच­याच्या रूपातले केस असेही म्हटले जाते

 

भारताततुन या दोन्ही प्रकारच्या केसांची निर्यांत मोठ्या प्रमाणात होते. रेमी केस भारतातल्या अनेक मंदिरातुन जमा केले जातात. तुम्ही जर कधी तिरूपतीच्या मंदीरात गेला असाल तर तिथे भक्तीभावाने लोक देवाला केसा अर्पण करताना दिसतात. परंतु हजारो लोक दररोज केस दान करताना दिसत असले तरी तिथे कधीच कुठल्या रस्त्यावर एकही केस आढळत नाही किंवा कोणाच्या जेवनातही केस अढळत नाहीत. मग हे केस नेमके जातात कुठे तर हे सर्व केस रेमी केस म्हणून जमा केले जातात आणि याची मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात केली जाते. या केसांना जगभरातुन मोठी मागणी आहे. या केसांचा वापर विग बनविण्यासाठी किंवा विविध प्रकारच्या केसरचना तयार करण्यासाठी केला जातो. अशा केसांची भारतीय बाजारात किंमत 10 हजार रूपये किलो पासून ते थेट 25 हजार रूपये किलो पर्यंत आहे

 

रेमी केसांपेक्षा नॉन रेमी केसांची किंमत बाजारात कमी असते कारण या केसांना व्यवस्थीत करण्यासाठी केमीकलचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे याची चमक कमी होते. म्हणून याची बाजारात किंमत घटते तरी पण अशा केसंाना देखील बाजारात 4 हजार ते 8 हजार प्रति किलो मागे भाव मिळतो

 

                केसांचे अभ्यासक निकि विल्सन यांच्या टीम ने जर्नल ऑफ रिमॅन्युफॅक्चरींग या  मध्ये असे म्हटले आहे की, केसांचा उद्योग हा जागतीक स्तरावर झपाट्याने वाढणारा उद्योग आहे. म्हणूनच या उद्योगात अनेक देशांनी आपली गंुतवणूक वाढवली आहे.

 

                भारतापाठोपाठ हाँग-काँग, पाकिस्तान, ब्राझील, अमेरिका, इंडिोनेशीया, व्हिएतनाम, चिन, जापान आणि नेदरलँड या देशांनीही केसांचे उद्योग वाढवलेले पहायला मिळतात. भारतातुन होणा­या केसांच्या निर्यातीत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा वाटा मोठा असल्याचेही म्हटले जाते. तर चिन हा केसांवर प्रक्रिया करणारा सर्वात मोठा देश असून चिन सर्वात जास्त आयात करणारा देश आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोणातुन टाकाऊ पदार्थाची पुनर्निमिती आणि पुनर्वापार म्हणूनही अनेक देश या व्यवसायाकडे बघत आहेत

 

                केसांचा वाढता व्यवसाय लक्षात घेता काही दिवसापूर्वी भारत सरकारने केसांच्या निर्यातीवर बंधने घालून दिली आहेत. पुर्वी केसांची निर्यात करण्याकरिता कोणतीही बंधने नव्हती मात्र आता निर्यातदाराला वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेट कडून परवानगी घ्यावी लागते

 

डॉ. . नि. सोनकांबळे

सहाय्यक प्राध्यापक,

राज्यशास्त्र विभाग,

एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद

 

Monday, June 19, 2023

बेदखलांची दखल घेणारी - बेदखल


 बेदखलांची दखल घेणारी - बेदखल

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

आजच बातमी वाचली, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला वेठबिगार मालकाने साखळदंडाने बांधून ठेवला. कोंडबा हाटकर यांची कादंबरी वाचून सीएचबी धारकांची अवस्था देखील अशीच आहे यावर शिक्कामोर्तब होत. कोंडबा हाटकर बोलतोय बाकीचे बोलत नाहीत एवढाच फरक.  


    तसं पाहिलं तर माझं चरित्र, कांदबरी, कथा आणि कवितांचं वाचन फारच कमी आहे. मला यातलं कोणतंही साहित्य जास्त आवडत नाही. पण काही मोजक्या लोकांचे चरित्र आणि काही कादंब­ऱ्या वाचण्यात आल्या आहेत. सहसा चळवळीत काम करणा­ऱ्या  लोकांनी लिहिलेले आणि चळवळीसाठी पुर्णवेळ देऊन लिहणा­ऱ्या लोकांच्या साहित्याकडे मी दुर्लक्ष करत नाही. याचाच एक भाग म्हणून चळवळीत काम करणारा आणि चळवळीसाठी लिहिणारा लेखक म्हणून परिचित असलेले कोंडबा हाटकर यांची बेदखल  कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.



    कोंडबा हटकर यांनी आतापर्यंत अनेक वर्तमानपत्रातून वैचारिक लेखन केले आहे. मला असे वाटत होते की, कोंडबा हटकर यांच्या हातुन एखादं वैचारिक पुस्तक लिहिलं जाईल परंतु अचानक त्यांची कादंबरी प्रकाशित करून त्यांनी माझ्यासह अनेकांना धक्का दिला. कारण वैचिारिक लेखन करत असताना अचानक कादंबरीकडे हा तरूण कसा काय वळला याचं उत्तरच सापडत नव्हतं. पण बेदखल जेव्हा वाचून पुर्ण झाली तेव्हा असं लक्षात आलं की, चळवळ आणि जगणं या दोन्हींच्या मध्यभागी असलेली मनातली खद-खद कुठे तरी बाहेर काढायची होती आणि याचं माध्यम म्हणून त्यांनी कादंबरी लेखणाचा प्रपंच केला.

    तसं पाहिलं तर ही कादंबरी रमेश वाघमारे नावाच्या एका सीएचबी प्राध्यापकाच्या भोवती फिरते. तोच या कादंबरीचा नायक आहे. इतर सर्व पात्रं ही रमेशच्या अवती भवतीची असली तरी कादंबरी वाचताना असं लक्षात येतं की, ही सर्व पात्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील असून त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.

    रमेश वाघमारेच्या आयुष्याचा आणि संघर्षाचा पट उलघडत असताना लेखकाने दोन अंगाने हा पट उलगडला आहे. एक तर रमेश वाघमारे या नावाने आणि दुसरा स्व कथनाने. या दोन्ही माध्यमातून त्यांनी रमेशच्या आयुष्याचा संघर्ष मांडला आहे. रमेश या कादंबरीचा नायक असला तरी हा नायक महाराष्ट्रातल्या प्रत्येक सीएचबी धारकाचा प्रतिनिधी आहे असेच म्हणावे लागते. कारण सीएचबीच्या धोरणाने रमेश सारख्या अनेकांना संघर्षाच्या वाटेवर तर आणलेच परंतु त्यांचे आयुष्य बर्बाद होईल अशी व्यवस्थाच निर्माण केली. 
 
ADVT

 

    शिक्षण वाघीनिचे दुध आहे असे म्हटले जाते परंतु आम्ही ज्या शिक्षणाला वाघीन समजुन तिचे दुथ पित आलो ती खरेच वाघीन होती का असा प्रश्न ही कादंबरी वाचल्यानंतर प्रत्येक सीएचबी धारकाणे स्वत:ला विचारला पाहिजे, अशा अवस्थेत ही कादंबरी वाचकाला घेऊन जाते आणि आपण स्वत: पेटुन उठलं पाहिजे याची जाणीवही करून देते. अनेकांनाच नव्हे तर सर्वच सीएचबी धारकांना हे सीएचबीचे धोरण चुकीचे आणि आयुष्याची राखरांगोळी करणारे आहे असे वाटत असले तरी याच्या विरोधा कोणीही बोलत नाही कारण या वर्षी सीएचबीच्या विरोधात संघर्ष केला तर पुढच्या वर्षी सीएचबी देखील मिळेल की नाही याची भिती प्रत्येक सीएचबी धारकाच्या मनात असते आणि आहे. ती भिती काढणारी चळवळ मात्र कोणीही उभी करत नाही आणि ति होणारही नाही. त्याची कारणे वेगवेगळी आहेत.

    बेदखल कादंबरीने सीएचबी धारकांच्या चळवळीचाही वेध काही प्रमाणात घेतला आहे, काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा त्या चळवळीचे प्रमाणच तेवढे आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. ही चळवळी पावसाळ्यात उगवलेच्या छत्रीप्रमाणे आहे असते की, काय? असाही प्रश्न ही कादंबरी वाचताना पडतो कारण अनेक चळवळी उभ्या राहिल्या आणि त्या पावसाळा संपला की, नष्टही झाल्या. अतिषय तुटपुंज्या वेतनात सीएचबी धारक उद्याच्या आशेवर जगताना दिसतो आहे. काही काही जन तर सीएचबी तत्वावरच सेवानिवृत्त झाल्याच्या नोंदी लेखकाने या कादंबरीत घेतल्या आहेत. सीएचबी वर कोणी 14 वर्ष कोणी 18 वर्ष तर कोणी 20 वर्षाहुन अधिक काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर सीएचबी धारकाचे वेतनच बंद होते अशा अवस्थेत अनेक प्राध्यापक हे आपल्या विद्यार्थ्यांच्या शेतातच कामाला होते. ही आवस्था बघुन लेखकाने ही व्यवस्थाच निर्लज्ज आहे आणि आपण या व्यवस्थेचे गुलाम आहोत असे सांगून यातून मुक्तीचा मार्ग आपल्याकाडे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    मुळात महाविद्यालयात तासिका कोण घेतं? नॅकचे सर्व कामे कोण करतं? अॅडमिशन प्रक्रियेत कोण असतं? पुर्णवेळ कार्यरत असलेल्या शिक्षकांचे तास देखील कोण घेतं? या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र एकच आहे ते म्हणजे सीएचबी धारक प्राध्यापक. मुळात सीएचबी धारक प्राध्यापक म्हणजे एक प्ररकारचा चतुर्थश्रेणी कर्मचारी असतो जो पुर्णवेळ प्राध्यापकाच्या हाताखाली कामाला दिलेला असतो अशीच अवस्था सीएचबी धारकांची झालेली आहे.
 
त्याचे आपमानास्पत जगणे केवळ महाविद्यालयातच नाही तर समाजात देखील आहे हे सांगत असताना नायकाच्या कुटंुबातील, गावातील, समाजातील आणि लग्न जुळवतानाचे अनेक संवाद या कादंबरीत आणले आहेत.

आपला मुलगा आज ना उद्या प्राध्यापक होईल हे स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारे आई वडील आणि त्यांना समाजातुन विचारले जाणारे प्रश्न हे भयानक वास्तव या कादंबरीत मांडले गेले आहे परंतु हे वाचून तरी आपण जागे होणार आहोत का? हा प्रश्न शिल्लकच राहतो.

महाराष्ट्राच्या बाहेर सीएचबीचे धोरण नाही. शिवाय अनेक राज्यात भरती प्रक्रिया देखील शासन स्तरावरून केंद्रिय पध्दतीने राबविली जाते. मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यात देखील प्राध्यापक भरती ही आयोगामार्फत केली जाते. महाराष्ट्रात त्याची मागणीही काही दिवस सुरू राहिली आणि नंतर शांत झाली.

सीएचबीच्या धोरणाने महाराष्ट्राच्या उच्चशिक्षीतांच्या पिढ्या बर्बाद केल्या आता नवीन शैक्षणीक धोरण किती पिढ्या बबार्द करणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. कारण पुन्हा परदेशी विद्यापीठे बाजारात येणार आहेत आणि शिक्षणाचे शेअर मार्केट होणार आहे. या आव्हांनाना आपण एक सीएचबी धारक म्हणून कसे पेलणार आहोत हे आजून तरी निश्चित नाही.

कोंडबा हटकर यांनी बेदखल या कादंबरीच्या माध्यमातुन कोणते प्रश्न निर्माण झाले आणि आमच्या पिढ्या कशा बर्बाद झाल्या याची दखल घेतली आहे परंतु हे वाचून हे निश्चत केले पाहिजे की नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर सीएचबी धारकांचे काय? याचा विचार केला पाहिजे. इतकंच नाही तर जे पर्मनंट प्राध्यापक आहेत त्यांनीही हा विचार केला पाहिजे की, महाविद्यालयांची संख्या कमी होणार आहे म्हणजे काय? आणि महाविद्यालयांचे क्लस्टर होणार आहे म्हणजे काय? येणा­ऱ्या दहा वर्षात सर्वच प्राध्यापकांची आवस्था सीएचबी धारकांसारखी होणार आहे. हे विसरता कामा नये. 2036 मध्ये पुन्हा एक कादंबरी "पर्मनंट प्राध्यापकांची परवड" या शिर्षकाखाली कोणीतरी नक्कीच लिहील. तुर्तास पर्मनंट प्राध्यापकांनी बेदखल वाचून सीएचबी धारकांची तरी परवड थांबवावी अशी आशा आहे. 
 
हेही पुस्तके वाचा  
 
 


कोंडबा हाटकर यांची बेदखल हि कादंबरी मागविण्यासाठी 9552133951 / 80555 55500  या  नं वर संपर्क साधा.

 

डॉ. ह. नि. सोनकांबळे
सहाय्यक प्राध्यापक,
राज्यशास्त्र विभाग,
एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद


Monday, April 10, 2023

आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?


 

आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने निलेश कराळे आणि विठ्ठल कांगणे या दोन कॉमेडी शिक्षकांची मागाणी भाषणांसाठी वाढत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दिवसेंदिवस मनोरंजनाकडे वळत चालली आहे याचे हे द्योतक आहे. पण खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इतकी मनोरंजक आहे का? याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. 

 
    2014 मध्ये एका कार्यक्रमात अरुधती रॉय असं म्हणाल्या होत्या की, ‘आम्हाला डॉ. आंबेडकर गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मनोरंजन नाही तर ती शोषीत, वंचीत समुहाच्या न्यायाची लढाई आहे आणि कोणतीही लढाई लढत असताना आपण जर विनोद करत बसलो तर त्या लढाईचे परिणाम काय होतील यावर जास्त सांगण्याची गरज नाही. 

 
    मागे काही दिवसांपूर्वी विद्रोही मराठी साहित्य सम्मेलनातही गर्दी जमवण्यासाठी आयोजकांनी निलेश कराळे यांना सम्मेलनाचे स्वागत अध्यक्ष केले आणि त्यातल्या एका विचारमंचाला “फुले-शाहू- आंबेडकर” विचारमंच असे नाव दिले. माझ्या दृष्टीकोणातुन हा फुले शाहू आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळीचा फार मोठा अपमान आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पट्टे बापूराव, दिलीप कुमार अशा मनोरंजन करणा­या लोकांना साधे जवळही थांबू दिले नाही. त्यांच्याच नावावर आज मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विद्रोही मराठी साहित्य सम्मेलन तरी गांभीर्याने घेतले जात असावे असे मला इतके दिवस वाटत होते पण विद्रोह देखील मनोरंजनाकडे वळला आहे असेच सध्या तरी दिसते आहे. 

 
    निलेश कराळे कोण? याचा शोध घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की, त्यांनी “बुलेट चालू घडामोडी” नावाचा एक महान ग्रंथ लिहला आहे आणि तो ग्रंथ विद्रोही मराठी साहित्यिकांना एवढा आवडला की बस्स…! त्यांना त्यांनी फुले-शाहू-आंबडकरी चळवळीचा नयक ठरवून टाकले. आज तेच आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या स्टेजवरून लोकांचे मनोरंजन करू लागले आहेत. 

 
    बे डोंमड्याहो, काचा-कचा, डुक­याहो, रान डुकरीन, कचकन, बुडया-टकल्या, साल्या, देऊ काय कोपच्यात, जा ना मरून, लिचोंड, ढस, धुस, फुससस, वानर तोंडया, बदमास लोकहो, भिकारवाडा, मारन भोकनेवा, पोट्टी जाते पोट्यासोबत फिरायले या आणि अशा अनेक शब्दातला निलेश कराळे यांचा विद्रोह कदाचित विद्रोही साहित्यिकांना जास्त आवडला असावा. तोच विद्रोह आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मंडळाला देखील आवडू लागला आहे. म्हणूनच की काय त्यांच्या तारखा देखील मिळणे सध्या कठीण झाले आहे. 

 
    तुम्ही जर या चळवळीतले दुसरे भाष्यकार बघितले तर त्यांचे नाव आहे विठ्ठल कांगणे, सध्या तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी चळवळीचे भाष्यकार म्हणून बोलू लागले आहेत. ते बोलणारच कारण जयंती समितीचा आग्रह आहे की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आणि मग ते मार्गदर्शन करायला येतात. तुम्ही जर यांचे नाव युटयुब ला सर्च करायला गेलात आणि विठ्ठल कांगणे असं सर्च केलं तर पुढचे शब्द फुल्ल, मोक्कार कॉमेडी असं आपोआप येतो. 

 
    ये दलिंदरा, बब्या, गौतमी पाटल, तु निराधार बायांच्या घरी बसतो, तोंडावर उलटी झापड देईन, क्लास करता करता पोरगी पटली, तुया बापाला आधी हाणलं पाहिजे, मग तु अंडरविअर विक अशे अनेक शब्द यांच्या तोंडून सातत्याने येतात. ही भाषा ऐकणारा आणि त्यांचे अनुकरण करणारा यांचा एक मोठा वैचारिक चाहता वर्ग आपल्याला पहावयास मिळतो. त्यामुळे या वर्गाची मागणी पुर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा मंच सध्या यांच्यासोबत शेअर केला जातोय. 

 
    लोक येतात, ऐकतात, पोट धरून हसतात आणि अशा पध्दतीने मग जगातल्या सर्वात महान विव्दान व्यक्तीची जयंती साजरी केली जाते आणि आम्ही कोणीच काही बालत नाही. आता वेळ आली आहे हे सर्व थांबवण्याची.

 
जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक दोन फोटो सोडले तर कुठेच हसताना दिसत नाहीत, कुठेच एखाद्या भाषणात जोक सांगताना दिसत नाहीत. किंवा कुठेच मनोरंजन करतानाही आढळत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावच इतकं सिरियस आहे की, हे नाव घेतांना मोठ मोठे विव्दान माणसांचे चेहरे गंभीर रूप धारण करतात. पण हे गांभीर्य मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणाऱ्यांना  आणि त्यांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनाच सध्या राहिले नाही.
पण आपण जर खरेच स्वत:ला डॉ. बाबासाहेब आंबेडरांचे अनुयायी किंवा वारस म्हणून घेत असू तर आपण हे सर्व थांबवले पाहिजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांभीर्याने समजून घेतले पाहिजेत. अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेही बाजारात विनोद/जोक यायला वेळ लागणार नाही. 

 
    तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला असे कार्यक्रम  जे  लोक आयोजित करत आहेत त्यांना थांबवा, त्यांना ही चळवळ किती सिरियस आहे हे सांगा. समाजाचा पैसा आणि वेळ यात व्यर्थ जातोय हेही पटवून सांगा. वाटलं तर जयंती क करू नका पण पण जयंतीच्या नावावर होणारा हा तमशा थांबवा अशी हात जोडून विनंती करा आणि ऐकतच नसतील तर ………! पुढचा निर्णय तुम्हीच घ्या. 

 

कारण महामानवांची जयंती महामानवांची जयंती वाटली पाहिजे. तिचा एक वेगळाच थाट असला पाहिजे. केवळ गर्दी जमवण्याच्या नावाखाली उद्या तमाशे होऊ देऊ नका.   

 

 हेही वाचा

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"  

 

रिझर्व बँक, लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  

जागतिक चर्चाविश्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 

 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि LIC चे राष्ट्रीयकरण  

 

अमेरिका-इंग्लंड-भारतीय संविधान आणि स्त्रिया  

 

स्वातंत्र्यापुर्वीच संविधानाचे 7 मसुदे तयार होते?  


Thursday, April 6, 2023

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

विनंती - ब्लॉग पेज ला फॉलो करायला विसरू नका.

 
आपल्या गावात केसांवर – काटे, फुगे, पिना, टिकल्या विकणारे रोजच पहायला मिळतात. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या रोजच्या विंचरण्याच्या केसातून अशा वस्तू खरेदी करतात. आता तर केसांवर भांडे आणि इतरही महत्वाच्या घरगुती वस्तु मिळतात. या वस्तू विकत घेतांना आपण त्या विक्रेत्यांना कधीच विचारत नाही की, हे केस किती रूपये किलो ने विकले जातात? पण या केंसांची किंमत आणि जगभरातील मार्केटचा विचार केला तर तुम्ही थक्क व्हाल.  



केसांची निर्यात करणारा भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. अनेक वर्षापासून जगभरात भारतीय केसांची प्रचंड मागणी राहील आहे. दरवर्षी जवळपास 165 मिलियन डॉलरच्या केसांची निर्यात भारतातून होते. या सर्व रकमेचा आकडा जर भारतीय रूपयांमध्ये बघितला तर 13,56,08,55,000.00 इतका होतो. भारताबरोबरच इतरही देश केसांची निर्यात करतात. परंतु भारतातून सर्वात जास्त केसांची निर्यात केली जाते.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, भारतच केसांच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर कसा काय? याचे साधे उत्तर आहे की, भारतात अशा काही धार्मिक प्रथा आणि परंपरा आहेत त्यात केसांचे दान केले जाते किंवा केस देवाला अर्पण केले जातात. 



भारतात अनेक वर्षापासून केशवपनाची प्रथा चालू होती असे आपण ऐकले असेल किंवा वाचलेही असेल. शिवाय तिरूपती बालाजी मंदिरात अनेक भक्त देवाला केस दान करतात. तुम्ही जर तिरूपतीला कधी गेलात तर तुम्हाला असे हजारो लोक देवाला केस दान करताना दिसतील. इतके लोक केस दान करणारे असताना देखील तिथे रस्त्यावर किंवा कच­यात कुठेही केस आढळून येत नाहीत. मग साधा प्रश्न पडतो की, हे केस नेमके जातात तरी कुठे?
याचे साधे सरळ उत्तर आहे या सर्व केसांची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि हे केस लाखोंच्या भावाने परदेशात विकले जातात. 



भारता बरोबरच इतरही काही देश असे आहेत जे केसांची निर्यात करतात. त्या देशांचा क्रमांक अनुक्रमे खालील प्रमाणे लागतो. 


केसांची निर्यात करणारे भारतातील प्रमुख देश – 2021


खालील आकडे दशलक्ष युस डॉलरमध्ये आहेत.(in million U.S. dollars)


1. भारत - 165 (in million U.S. dollars)

2. हाँग काँग – 4.1
3. पाकिस्तान – 2.2
4. ब्राझील – 2.1
5. अमेरिका – 0.92
6. इंडोनेशिया – 0.8
7. व्हिएतनाम – 0.66
8. चिन – 0.53
9. जापान – 0.51
10. नेदरलँड - 0.41

भारतातून होणा­या केसांच्या निर्यातीत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यातून जास्त केसांची निर्यात केली जाते. 



भारतात दोन प्रकारचे केसा गोळा केले जातात एक रेमी आणि दुसरे नॉन रेमी केस. रेमी केस हे सर्वोत्तम आणि चागल्या दर्जाचे केस असतात जे मंदिरामधून गोळा केले जातात जिथे लोक धार्मिक भावनेतून देवाला किंवा देवीला केस दान करतात. ज्याचा उपयोग विग साठी किंवा इतर प्रकारच्या केस रचनेसाठी करतात तर नॉन रेमी केस हे खेड्यापाडयातून कच­याच्या रूपात जमा केले जातात. 


काही दिवसांपूर्वी भारत सरकारने केंसांच्या निर्यातिवर बंधने घालून दिली आहेत. पुर्वी केसांची निर्यात करण्याकरीता कोणतीही बंधने नव्हती मात्र आता निर्यातदाराला वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यरित असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड कडून परवानगी किंवा परवाना घ्यावा लागतो. 

 

हेही वाचा 

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया" 

 

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला.  

 

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !  


Saturday, April 1, 2023

ambedkar podcast Series : देशातल्या ३६ प्लॅटफॉर्म वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० पैलू

 
 
 
ambedkar podcast Series : देशातल्या ३६ प्लॅटफॉर्म वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० पैलू 
 

 यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने एका नवीन उपक्रमाची सुरूवाम करण्यात आली आहे. या मध्ये छत्रपती शिवाजी महराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या पाच महापुरूषांचे ििवचार नवीन पिढीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोहोचवण्यासाठी ऑडिओ पॉडकास्ट सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. ही ऑडिओ पॉडकास्ट सिरीत श्रोतावर्गाला आवडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महापुरूषांचे विचार युवा पिढी पर्यंत पोहचवण्याचा चव्हाण सेंटरचा मानस सफल होताना दिसतो आहे. 


    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट नवीन विषयांसह डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी उलगडून सांगितला आहे. त्यांचे विचार 10 एपिसोडच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. 


    हे सर्व एपिसोड
Apple Podcast, Google Podcast, Amazone Music, Gaana.com, Savan.com, Spotify यशवंतराव चव्हाण सेंटरची वेबसाईट/ फेसबुक पेज/ इन्स्टाग्राम/ व्टिटर यांसह 36 हून अधिक प्लॅटफॉर्म वर ऐकायला मिळतील. 


    ambedkar podcast आपण खलील दिलेल्या टायटल लिंकवर क्लिक करूनही ऐकू शकता.

इथे क्लिक करा :

 

1. इथे क्लिक करा : भारताचे परराष्ट्र धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

2. इथे क्लिक करा : स्वातंत्र्यपूर्वीचे सात संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

3. इथे क्लिक करा :शेती आणि आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

4. इथे क्लिक करा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश 

 

5.इथे क्लिक करा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'ट्रेंनिग स्कुल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स' 

 

6. इथे क्लिक करा :इन्शुरन्सचे राष्ट्रीयीकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

7. इथे क्लिक करा :आरक्षण : एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी 

 

8. इथे क्लिक करा :ब्रिटिश पार्लमेंटचे 'द आंबेडकर प्रिन्सिपल्स 

 

 

 

 ambedkar podcast

Wednesday, March 29, 2023

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"

 

 
सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"
डॉ. ह. नि. सोनकांबळे
 

सम्राट अशोक हे महान मौर्य वंशाचे कुलदीपक होते, ज्यांनी आपल्या कृतीने केवळ कुटुंब, कुळ आणि समाजालाच नव्हे तर देश आणि जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला.  मौर्य वंशातील महान सम्राट अशोकाने अखंड भारतावर राज्य केले, त्याचे साम्राज्य उत्तरेकडील हिंदुकुश पर्वतरांगापासून दक्षिणेला गोदावरी नदीपर्यंत, पूर्वेला बांगलादेशापासून ते अफगाणिस्तान, पश्चिमेला इराणपर्यंत पसरले होते.पण भारताला ‘अखंड भारत’ असे म्हणतात. आजचा संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार हे चक्रवर्ती सम्राट अशोकाचे राज्य होते. सम्राट अशोकाच्या काळाच "भारत सोने की चिड़िया," असे संबोधले जाते.  आज तो सोने की चिड़िया राहिला नाही.


अशोकाचा खजिना आजही लोकांसाठी एक गूढच आहे. असे म्हणतात कि, अशोकाच्या खजिन्यात 70 हजार टन सोने होते. परंतु या खजिन्याची माहिती त्याच्या 9 गुप्त हेरांकडे होती. अशोकाच्या विशाल साम्राज्याची जबाबदारी अत्यंत हुशार अशा 9 हेरांकडे देण्यात आली होती. अशोकाविषयी असेही म्हटले जाते की त्यांच्याकडे काही महारथी होते ज्यांना पारस दगडापासून सोने बनवण्याची कला ज्ञात होती.

 



त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य चैत्य व विहार बांधले. अशोकाने देशाच्या विविध भागात प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांवर धर्मस्तंभांची स्थापना केली. अशोकाच्या काळात अचूक नियोजन, अचूक प्रमाण, संतुलित कल्पनाशक्ती, उद्देशाचे निश्चित यश, सौंदर्यात्मक उदात्तता आणि धार्मिक प्रतीकात्मकता यामुळे स्तंभ बांधणीची कला शिखरावर पोहोचली होती. या खांबांचा वापर स्थापत्यशास्त्रीय नसून स्मारकात्मक होता.

.


अशोकाच्या धर्मप्रसारातून कलेला खूप प्रोत्साहन मिळाले. त्यांनी आपल्या धर्मग्रंथांच्या चिन्हासाठी ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिपी वापरल्या आणि लेखनाची कला देशभर पसरली. अशोकाच्या काळात धार्मिक स्थापत्य आणि शिल्पकलेचा अभूतपूर्व विकास झाला.  त्यांनी तीन वर्षांत 84,000 स्तूप बांधले. यापैकी ऋषिपट्टन (सारनाथ) येथे त्यांनी बांधलेल्या धर्मराजिका स्तूपाचे अवशेष आजही दिसतात. बौद्ध सम्राट अशोकाने बौद्ध अनुयायांसाठी हजारो स्तूप आणि विहार बांधले. त्यांचा एक स्तूप, ग्रेट सांची स्तूप, UNECSO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.


सम्राट अशोकाकडून या सहा गोष्टी आपण शिकल्या पाहिजे

आत्म-सुधारणा: 


 
अशोकाच्या शिकवणुकीतून प्रकट होणारे पहिले सत्य म्हणजे आत्म-मूल्यांकनाद्वारे स्वतःला वाईटाकडून चांगल्याकडे आणि चांगल्याकडून चांगल्यामध्ये बदलण्याची क्षमता. अशोकाने आपल्या भूतकाळातील कृत्यांचे आत्ममूल्यांकन केले नसते तर त्याने आपला स्वभाव सुधारण्याचा विचार कधीच केला नसता. स्व-मूल्यांकनामध्ये त्यांचे दोष लक्षात घेणे आणि त्याच परिस्थितीत त्यांच्या प्रतिसादात तीव्र बदलांसह त्यांचे मार्ग सुधारणे समाविष्ट आहे. अशा प्रकारे, त्यांनी पूर्वी युद्धाचा प्रचार केला, परंतु बदललेल्या अशोकाने पुढे शांततेवर विश्वास ठेवला.

संवादाची नवीनतम साधने: 

 
अशोकाच्या जीवनातील आणखी एक मोठा धडा म्हणजे आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संवादाच्या नवीनतम माध्यमांचा वापर करणे. अशोकाचे शिलालेख  केवळ त्याच्या साम्राज्याची मुख्य लिपी ब्राह्मीमध्येच कोरलेले नाहीत, तर ग्रीक, अरामी (एक प्राचीन पर्शियन लिपी) आणि वायव्य भारतातील स्थानिक लिपी खरोष्टीमध्ये देखील कोरले गेले. या सर्व शिलालेखांतून त्याने दिलेले संदेश हे संदेश जागतिक स्वरूपाचे आहेत.

परराष्ट्र धोरण: 

 
सीमेवर शांतता सुनिश्चित करण्यासाठी अशोकाच्या परराष्ट्र धोरण नीती आजही विचार करण्यास भाग पडणारी आहे. कलिंग जिंकल्यानंतर त्याने पाच ग्रीक शासकांशी संपर्क ठेवला. वाटाघाटीने शांतता प्रस्थापित करण्यासाठी असा जागतिक करार करणारा अशोक हा पहिला भारतीय शासक ठरला. अशोकाचे शेजार्‍यांसोबतचे शांततापूर्ण संबंध हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी होते. त्यांच्यात अशोकाच्या परराष्ट्रनीतीचा प्रभाव असल्याचे दिसून येते. 

 


 


 प्राणी संरक्षण हक्क: 

 
अवांछित यज्ञांपासून प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या अशोकाच्या धोरणामुळे शाकाहार हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या दिशेने चळवळ सुरू झाली. प्राण्यांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून, अशोकाचे धोरण जगातील पाळीव प्राणी आणि वन्यजीव संरक्षणासाठी दयाळूपणे वागण्याचा एक मैलाचा दगड आहे.

 समानता: 

 
अशोकाने एक कल्याणकारी राज्य निर्माण केले आणि आपल्या लोकसंख्येच्या कल्याणासाठी जवळजवळ पितृत्वाची आवड घेतली, त्याच्या चार दशकांच्या शासनकाळात सर्व प्रजेसाठी समान कायदे आणि शिक्षा होती. राज्याचा पैसा जलसाठ्यांच्या विकास/सुधारणेवर खर्च करण्यात आला, सावलीच्या झाडांनी नटलेले महामार्ग, विहिरी, बागा आणि प्रवाशांसाठी सार्वजनिक अतिथीगृहे बांधण्यात आली.

संयम: 

  त्यांचा सहिष्णुतेचा सल्ला एका शिलालेखात समोर येतो जेथे त्यांनी घोषित केले आहे की, 'सर्व संप्रदाय कोणत्या ना कोणत्या कारणाने आदरास पात्र आहेत. अशा प्रकारे कृती करून, एखादी व्यक्ती केवळ स्वतःच्या समुदायाची उन्नती करत नाही तर इतर लोकांच्या समुदायाची आणि सर्वसाधारणपणे मानवतेची सेवा करते.' 

 


सम्राट अशोकाची १० तत्वे

1. उदारमतवादी असणे आणि स्वार्थ टाळणे.

2. उच्च नैतिक चारित्र्य राखणे.  

3. प्रजेच्या कल्याणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करण्यास तयार राहणे.

4. प्रामाणिक असणे आणि पूर्ण सचोटी राखणे.

5. दयाळू आणि सौम्य असणे.

6. साधे जीवन जगणे.

7. कोणत्याही प्रकारच्या द्वेषापासून मुक्त असणे.

8. अहिंसेचे पालन करणे.

9. संयम राखणे.

10. शांतता आणि सौहार्द वाढवण्यासाठी जनमताचा आदर करणे.

 

हेही वाचा 

 
आधुनिक जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे पुस्तक “साखळीचे स्वातंत्र्य” 

महार बटालियनचे जुने संचलन गीत आपल्याला माहीत आहे का? 

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख  


अशोकाने कलिंगचे युद्ध जिंकल्यानंतर एका शिवलालेखातून भावी पिढीला एक संदेश दिला आहे.
आपल्या एका शिलालेखात त्यांनी असे म्हटले आहे:

“मी राजा झाल्यानंतर आठ वर्षांनी मी कलिंग  जिंकले. या युद्धात सुमारे दीड लाख लोकांना कैदी बनवले गेले. एक लाखाहून अधिक लोक मारले गेले.
यामुळे मला खूप वाईट वाटले. का? जेव्हा स्वतंत्र देश जिंकला जातो तेव्हा लाखो लोक मारले जातात आणि अनेकांना कैद केले जाते.
यामध्ये ब्राह्मण  आणि श्रमिक देखील मारले जातात. जे आपल्या नातेवाईकांवर आणि मित्रांवर खूप प्रेम करतात आणि दास आणि पूर्वजांना समर्पित आहेत,
ते युद्धात मारले गेले किंवा त्यांचे प्रियजन गमावले जातात. त्यामुळे मला पश्चाताप होत आहे.

आता मी धम्माचे पालन करायचे आणि इतरांना शिकवायचे ठरवले आहे.  माझा असा विश्वास आहे की धम्मद्वारे लोकांची मने जिंकणे हे बलाने बदला घेण्यापेक्षा चांगले आहे.
मी हा शिलालेख का लिहीत आहे. कारण, माझ्यानंतर माझी मुले-नातू यांनी अशी युद्धे करू नयेत.  

त्याऐवजी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार कसा करता येईल याचा विचार का करावा.


Saturday, March 18, 2023

आधुनिक जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे पुस्तक “साखळीचे स्वातंत्र्य”

 


 आधुनिक जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे पुस्तक “साखळीचे स्वातंत्र्य”

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

एखादा चित्रपट पाहताना आपल्याला एखाद्या नायकाच्या एंन्ट्रीची जशी उत्सुकता असते तीच उत्सुकता या पुस्तकाच्या एका पानावरून पुढच्या पानावर जाताना आपल्या मनात निर्माण होत जाते. हे पुस्तक सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला कुठेच ब्रेक घेऊ देत नाही. सोतोशी नाकामोटो हा नायक जगासमोर तर आलाच नाही शिवाय तो पडद्यावरही येत नाही. पण एखादा चित्रपट नायकाशिवाय असेल तर याचा प्रत्यक्ष थरार वाचकाला वेगळाच अनुभव देऊन जातो. हा थरार अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि हो यावर चर्चा करायला अजिबात विसरू नका.(तसेही तुम्ही विसरणार नाहीच म्हणा कारण हे पुस्तक तुम्हाला बोलते केल्याशिवाय राहत नाही.)



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” या ग्रंथाला या वर्षी शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. हा ग्रंथ आजूनही अनेकांना लवकर समजत नाही. मलाही तो पुर्णपणे समजला नाही. कदाचीत याचे कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही हेही असू शकते. पण माझ्या माहितीप्रमाणे या ग्रंथावर कधीच एखादे चांगले सोप्या भाषेतले व्याख्यानही ऐकायला मिळाले नाही. पण गौरव सोमवंशी यांचे साखळीचे स्वातंत्र्य हे पुस्तक वाचल्यावर पुन्हा एकदा “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” हा ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण झाली. कारण अर्थशास्त्रातल्या अनेक संकल्पना अगदी सोप्या भाषेत गौरव सोमवंशी यांनी समजून सांगितल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” हा ग्रंथ समजायला सोपा होतो.



    खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटत होते की, आपण आपल्या अर्थव्यवस्थेवरती बारकाईने लक्ष ठेवून असले पाहिजे. ति कुठे आणि कशी बदलते हे आपण समजून घेतले पाहीजे. कदाचीत हा मंत्र गौरव सोमवंशी यांना समजला असावा आणि त्यातूनच “साखळीचे स्वातंत्र्य” या पुस्तकाचा जन्म झाला असावा असे वाटते किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थीक विचारांच्या प्रभावातून एक नवी दृष्टी लेखकाला प्राप्त झाली आहे म्हणूनच जगाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेला नजरकैदेत ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे, असेही म्हणता येईल. शिवाय लेखक जगाच्या अर्थव्यवस्थेला नजरकैदेत ठेवून शांत न बसता जगाच्या अर्थव्यवस्थेकडे आणि नव तंत्रज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोणही वाचकांना देतो. कारण चलन म्हणजे काय?, प्राचीन चलनाची पध्दत कशी होती? इथून ते बिटकॉईन पर्यंतचा प्रवास लेखकाने अतिषय सोप्या भाषेत सांगण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. 



    मुळात कोणतेही नवे तंत्रज्ञान आले की, आपण सुरूवातीला पेक्षकाच्या भूमिकेत असतो आणि हळू हळू आपण त्याच्या जवळ जायला लागतो आणि एके दिवशी आपण त्याच्या जाळ्यात अडकतो. आजपर्यंतच्या सर्वच तंत्रज्ञानांच्या बाबतीत असेच घडल्याचा इतिहास आहे. मग ते रेडिओ, टेलिव्हीजन, संगणक असो की आपली मूलभूत गरज बनलेला मोबाईल असो. या सर्वच तंत्रज्ञानाकडे सुरूवातील आपण दुरून बघत होतो आणि आता आपण पुर्णपणे त्याच्या जाळ्यात आहोत. 


   हे सर्व तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला बराच काळ गेला. जोपर्यंत आपण हे तंत्रज्ञान समजून घेण्याचा आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो तो पर्यंत जगात दुसरीकडे अनेक नव्या तंत्रज्ञानांचा जन्म होतो. पण सध्या बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स असे काही नवीनच शब्द आपल्या कानावर पडत आहेत आणि त्यावर थोडीफार चर्चा दखील आपण ऐकतोय. पण ही चर्चा किती सत्य आणि किती असत्य याचा अंदाज आपल्याला तोपर्यंत बांधता येत नाही, जापर्यंत आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही. शिवाय आपल्या अभ्यासाची साधने देखील प्रमाणीत नसल्याने तिथे देखील आपली फसगतच होते. म्हणून कोणतीही बाब पुर्णपणे आणि सत्य समजून घ्यायची असेल तर आपल्याला प्रमाणीत साधनांचा आर्थांत प्रमाणीत संदर्भाचा आधार घ्यावा लागतो.  



    बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स या नवप्रणाली समजून घेताना देखील आपली अवस्था अशीच झाली आहे. आपण प्रमाणीत साधनांचा आणि संदर्भाचा आधार न घेतल्याने या सर्वच प्रणालींच्या बाबतीत आपल्या मनात संभ्रम आहे. पण हा संभ्रम जर दुर करायचा असेल तर गौरव सोमवंशी यांनी लिहलेले साखळीचे स्वातंत्र्य हे पुस्तक एकदा नक्कीच वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला आपसूकच असे वाटेल की, कोणतीही नवप्रणाली ही जगाला कवेत घेत नाही तर या नवप्रणालीच्या आधारावर आपण जगालाच कवेत घेऊ शकतो. 



    21 व्या शतकातली जगाची अर्थव्यवस्था आणि नवं तंत्रज्ञान समजून घ्यायचे असेल तर आपण व्हाट्सअप आणि फेसबुक विद्यापीठावर अवलंबून असून चालणार नाही. आपण जर या विद्यापीठावर अवलंबअून राहिलो तर आपली मोठी फसगत होवू शकते. म्हणून ज्यांना आपली फसगत टाळायची आहे आणि बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी, टोकनॉक्सि, क्रिप्टोकरन्सी या नवप्रणालीसह ब्लॉकचेन समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचावेच लागेल. कारण हे पुस्तक आपल्या समज आणि गैरसमजाच्या दोन्ही बाजू अत्यंत सोप्या भाषेत दूर करते. शिवाय हे पुस्तक अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राची जोड देत हे बँकिंग, शेती, वित्तपुरवठा, व्यवसाय, व्यापार अशा विविध क्षेत्रात नेमके काय बदल होत आहेत आणि भविष्यात काय बदल अपेक्षीत आहेत याचीही सखोल चर्चा करते. त्यामूळे वाचकाला जगाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. 

blockchain technology
binance smart chain
blockchain mining blockchain technology
web 3
blockchain wallet

 

हेही वाचा :


...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा लावला. 

 

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!  


पं. नेहरू आणि भारताचे विज्ञान (आणखी फोटो पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा)



Monday, March 13, 2023

“कसोटी विवेकाची” पाहण्यासाठी उद्या शेवटची संधी

 


 “कसोटी विवेकाची” पाहण्यासाठी उद्या शेवटची संधी

 

 डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

 टीप : दि. १४ मार्च रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार होता मात्र जनतेच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन  दि. १५ मार्च २०२३ रोजी देखील सुरु असणार आहे.

 

कोणत्याही धर्माला आणि लोकांच्या धार्मीक स्वातंत्र्याला विरोध न करता लोकांना श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक सांगून अंधश्रध्देतून बाहेर काढण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्ची केलेल्या नरेंद्र दाभेळकर यांच्या संपुर्ण आयुष्याचा प्रवास हा प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांचा हा प्रवास चित्र आणि शल्पाच्या माध्यमातून नव्या पीढीसमोर मांडण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम सध्या महराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो आहे. हाच उपक्रम सध्या छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरु असून दररोज हजारो नागरीक आणि विद्यार्थी या उपक्रमाला भेट देत आहेत. 

 


 यशवंतराव चव्हाण सेंटर आणि एमजीमए विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तथा मुंबईतील पत्रकरांची “फ्रेंन्डस ऑफ दाभोलकर परिवर्तन संस्था” निर्मीत  “कसोटी विवेकाची” या  नरेंद्र दाभोलकर यांच्या जिवणावर आधारीत चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे. याचा उद्घाटन सोहळा दि. 9 मार्च 2023 रोजी सुप्रसिध्द लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्य हस्ते पार पडला होता.  

 

 
नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावर आधारीत “कसोटी विवेकाची” या चित्र आणि शिल्प प्रदर्शनातील सर्व कलाकृती या मुंबई येथील जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. या पुर्वी मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह अनेक शहरांत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. दाभेलकरांच्या जिवनांविषयी व त्यांच्या अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी हा दृष्टीकोण घेऊन संपुर्ण कलाकारांनी आपल्या कलाकृती तयार केलेल्या आहेत.
 
या उपक्रमात काय पहायला मिळेल:



या उपक्रमात नरेंद्र दाभोलकरांचा  एकुणच प्रवास चित्र आणि शिल्प रूपात मांडण्यात आला आहे. त्यांचे बालपण, शिक्षण, चळवळीकडे ते कसे आकर्षीत झाले आणि त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलनाची ही चळवळ कशा प्रकारे उभी केली याचा पट या प्रदर्शनात सहज समजून घेता येणार आहे.

पुस्तक प्रदर्शन: 

 

 


 
“कसोटी विवेकाची” या  प्रदर्शनात नरेंद्र दाभोलकर लिखित सर्व पुस्तकांचे प्रदर्शनही भरवण्यात आलेले आहे. शिवाय काही पुस्तके आपल्याला विकत देखील घेता येणार आहेत.

अंधश्रध्देचे अर्थात जादूचे प्रयोग :

 


 जालना येथील शंकर बोर्डे यांचे चमत्काराचे प्रयोगही बघायला मिळणार आहेत. (हे प्रयोग पुर्ण दिवसभर असणार नाहीत. आयोजक वेळ निश्चित करून हे प्रयोग सादर करतील)

आपल्या शंकांचे निरसन:

 
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातला फरक जाणून घेण्यासाठी किंवा आपल्याला या अनुषंगाने काही प्रश्न पडले असतील तर त्याचेही समाधान या प्रदर्शनाच्या दरम्यान तज्ञ मार्गदर्शक करणार आहेत.

भेट देण्यासाठी पत्ता : 

 
कला दिर्घा आर्ट गॅलरी,
एमजीएम क्रिकेट स्टेडियम बिल्डींग,
सेंन्ट्रल नाका रोड,
छत्रपती संभाजी नगर





दि. 9 मार्च 2023 ते दि. 15 मार्च 2023 रात्री 08:00 वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. आजपर्यत या प्रदर्शनाला अनेक नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेटीर दिल्या आहेत. आपणही एकदा नक्की भेट द्या.  

 

हेही वाचा   

अनुराधाची रिक्षा : संघर्षाची साथीदार  

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!  

Thursday, March 9, 2023

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!

 


पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!

 

 डॉ. ह. नि. सोनकांबळे 

 

यशवंत हा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा दत्तक मुलगा. दक्षिण आफ्रिकेत डॉकटर होता. १९९६-९७ च्या वर्षी तो पुण्याला परत आला कारण त्याला आपल्या आईची तार आली होती.  पुण्यात प्लेगने थैमान घेतले आहे अशा अवस्थेत तुझी गरज इथल्या लोकांना आहे असा संदेश यात नमूद होता. तार मिळताच यशवंत पुण्याला आला. पुण्याच्या जवळ असलेल्या हडपसर मध्ये डॉ. यशवंत फुले यांच्या सासऱ्याची जमनी होती त्या जमिनीवर सावित्रीबाई आणि यशवंत यांनी मिळून झोपड्या उभ्या केल्या आणि याच झोपडीत त्यांनी दवाखाना सुरु केला. हडपसर हा भाग तेव्हा पुण्यापासून थोडा दूर होता. लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून पुण्यात पेशन्ट आणून इथे ऍडमिट केले जायचे. यशवंत ने इथे हॉस्पिटल सुरु केले. सावित्रीबाई तेव्हा घराघरात जाऊन लोकांची चौकशी कारायच्या आणि कोणी आजारी असेल तर त्याला तात्काळ यशवंतच्या दवाखान्यात ऍडमिट करायच्या.



प्लेगच्या साथीच्या काळात सवित्रीमाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली. अशातच त्यांना पांडुरंग गायकवाड या झोपडपट्टीतल्या अस्पृश्य पोराला प्लेग झाल्याचे समजले. सवित्रीमाईंनी पांडुरंगला चंदरात गुंडाळले आणि पाठीवर घेऊन साधारण ८ किलोमीटर दूर असलेला दवाखाना गाठला. त्याला चांगले उपचार मिळाले आणि पांडुरंगाचे प्राण वाचले. पण सावित्रीमाईंना मात्र यात संसर्ग झाला आणि त्या आजारी पडल्या. त्यांचा मृत्यू झाला. एका झोपडितल्या पांडुरंगाला वाचविण्यासाठी सवित्रीमाईंनी आपला प्राण त्याग केला. पुढे यशवंतलाही संसर्ग झाला आणि त्यांचाही मृत्यू झाला. 



महात्मा फुले , सावित्रीबाई फुले आणि यशवंत यांचे जीवन म्हणजे 

उपकारासाटीं बोलों हे उपाय । 


येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥


बुडतां हे जन न देखवे डोळां । 


येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥


तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । 


भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥


संत तुकाराम काहाराजांच्या या अभंगाप्रमाणेच म्हणावे लागेल. कारण लोक दारिद्रयात, अंधश्रद्धेत, अज्ञानात असताना त्यांना कधीच बघावेसे वाटले नाहीत. त्याच्या मुक्तीचे दार उघडण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. या कर्यात त्यांनी आपल्या मुलालाही सहभागी करून घेतले आणि या सेवेतच त्यांनी आपला प्राणार्पण केले. 

 

हेही वाचा 

रिक्षाचालक अनुराधाच्या संघर्षयाची कहाणी 

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला ! 

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा लावला.



 अशा महान मातेचा आज स्मृती दिन त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.